शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अधिग्रहणाचा मावेजा थकवल्याने माजलगावच्या उपविभागीय कार्यालयातील साहित्य जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:35 IST

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील टेबल, खुर्ची, कॉम्प्यूटर, बॅटऱ्या आदि साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

माजलगाव ( बीड) : भूमी अधिग्रहण प्रकरणातील तब्बल ५७ लाख रुपयांच्या मावेजा रकमेची अंमलबजावणी न केल्याने माजलगाव येथील दिवाणी न्यायालयाने शासन आणि संपादन संस्थांच्या मालमत्तांवर थेट जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी जप्तीची कारवाई करण्यात आली असून उपविभागीय अधिकारी कार्यालयातील टेबल, खुर्ची, कॉम्प्यूटर, बॅटऱ्या आदि साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणात दोन वेगवेगळ्या अर्जावर सुनावणी झाली. पहिल्या प्रकरणात, अर्जदार मोहन आश्रुबा नागरगोजे यांनी २६ लाख ६६ हजार ८०२ रूपये इतकी रक्कम वसूल करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ च्या आदेश २१ नियम ३० अन्वये अर्ज दाखल केला होता. ही रक्कम एलएआर ८७/२०११ मधील संपादन प्रकरणाशी संबंधित असून न्यायालयीन निर्णय मिळूनही संबंधितांनी मावेजा बाबत अंमलबजावणी केली नव्हती. दुसऱ्या प्रकरणात, वैजनाथ व इतर अर्जदारांनी दाखल केलेल्या प्रकरणात सुमारे ३० लाख रुपयांच्या वाढीव मावेजा बाबत अर्ज दाखल केला होता. हे बक्षीस २०१६ मधील संपादन प्रकरणाशी संबंधित असून, शासनाने अद्याप ते अंमलात आणले नव्हते. 

या दोन्ही प्रकरणांत संबंधित सरकारी अधिकारी यांच्या वतीने दोन्ही प्रकरणास विरोध करण्यात आला. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असून केवळ कार्यवाही करणारे असल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र न्यायालयाने या सर्व युक्तिवाद फेटाळून लावत अर्ज मंजूर केले. न्यायनिर्णयप्राप्त जिल्हाधिकारी यांच्या वतीने स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात कोणतीही स्थगिती मिळालेली नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

विशेष म्हणजे, या प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिकांमधून स्पष्ट निर्देश दिले होते की, संबंधित शासकीय मालमत्तांवर तात्काळ जप्ती आणून ती विक्री करून तीन महिन्यांच्या आत अर्जदारांना रक्कम वितरित करण्यात यावी. यावर आधारितच माजलगाव येथील दिवाणी न्यायाधीश (ज्येष्ठ स्तर) स.स. बुद्रूक यांनी २ जुलै रोजी दोन्ही अर्जावरील निर्णय देताना विशेष बेलिफ कक्षामार्फत मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी वेळेत व्हावी, यासाठी ही कठोर कारवाई केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय  यांच्या कार्यालयातील २० खुर्ची, २० कपाट,  संगणक, बॅटरी व इन्व्हर्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांची गाडी केली होती जप्तीशेतकऱ्यास मावेजा न दिल्याने यापूर्वी वेगळ्या प्रकरणात येथील उपविभागीय अधिकारी यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर त्याच प्रकारात बीडचे जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करून न्यायालयात हजर केली होती.

टॅग्स :BeedबीडRevenue Departmentमहसूल विभागCourtन्यायालय