शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांडात चौघांना जन्मठेप, ९ वर्षांनंतर लागला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 17:02 IST

११ आरोपींमध्ये अनोळखी पाच महिलांचा उल्लेख होता; परंतु सबळ पुराव्याअभावी पाचही महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

अंबाजोगाई : तालुक्यातील तडोळा शिवारात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यासह साक्षीदाराचा कोयत्याने खून केल्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, तर साक्षीदाराला जखमी केल्याप्रकरणी इतर दोघांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्या. एम. बी. पटवारी यांनी २३ नोव्हेंबर रोजी सुनावली.

वसंत मुकुंदराव कराड (रा. वांगदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) यांची तडोळा शिवारात गट क्र.१४७ व १४८ मध्ये शेती आहे. तेथे त्यांनी ऊसलागवड केलेली होती. १६ एप्रिल २०१२ रोजी कराड यांच्या शेतातील ऊस तोडून घेऊन जाताना शेजाऱ्यांशी वाद झाला. यावेळी आरोपींनी कोयता व कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात, पाठीवर गंभीर जखमा केल्या व साक्षीदार गणेश गंभिरे, तत्कालीन सरपंच बबन कराड यांनासुद्धा मारहाण केली. या हल्ल्यात वसंत मुकुंदराव कराड, लक्ष्मण गंभिरे, गणेश गंभिरे, बबन कराड हे गंभीररीत्या जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वसंत मुकुंदराज कराड यांना डॉक्टरांनी घोषित केले, तर उपचारादरम्यान लक्ष्मण नरहरी गंभिरे यांचा मृत्यू झाला. गणेश सुदाम गंभिरे यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर ठाण्यात तडोळा येथील ११ आरोपींविरोधात कलम ३०२, ३०७, ३२६, ३२४ भादंविसह गुन्हा दाखल करण्यात आला होता. बर्दापूर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केले. उत्तरीय तपासणी अहवाल व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्या. एम. बी. पटवारी यांनी मदन ग्यानदेव पुजारी व महादेव ग्यानदेव पुजारी यांना वसंत कराड यांच्या खुनाबद्दल दोषी धरून जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच हल्लाकरतेवेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण नरहरी गंभिरे यांच्या खून प्रकरणात बळीराम ग्यानदेव पुजारी व अंकुश ग्यानदेव पुजारी यांनादेखील जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला, तर घटनास्थळावरील साक्षीदाराला मारहाण केल्याबद्दल अरुण ग्यानदेव पुजारी, राजकुमार ग्यानदेव पुजारी यांना कलम ३२४ प्रमाणे एक वर्ष, तर कलम ३२६ प्रमाणे दोन वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. लक्ष्मण फड यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. अनंत तिडके यांनी सहकार्य केले. पो.हे.कॉ. गोविंद कदम व बी. एस. सोडगीर यांनी पैरवी म्हणून काम केले. घटनेच्या ९ वर्षानंतर मारेकऱ्यांना शिक्षा झाल्याने मयतांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले.

पाच महिलांची निर्दोष मुक्ततादुहेरी खून प्रकरणात सहा आरोपींनी दोघांचा खून व दोघांना जखमी केल्यामुळे सहा आरोपीविरुद्ध आरोपी सिद्ध झाल्यामुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. फिर्यादीत ११ आरोपींमध्ये अनोळखी पाच महिलांचा उल्लेख होता; परंतु सबळ पुराव्याअभावी पाचही महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

व्हीसीद्वारेच सुनावला निकालअतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. बी. पटवारी यांनी या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी ठेवली होती. बीडच्या कारागृहात असलेल्या चौघा आरोपींना व्हीसीवर घेत सुनावणी झाली. यात सहा जणांना दोषी ठरविण्यात आले. या निकालाकडे अंबाजोगाई तालुक्याचे लक्ष लागले होते. काही साक्षीदार फितूर झाले असले तरी सरकार पक्षाचा युक्तिवाद व जखमींचा जबाब ग्राह्य धरूनच ही शिक्षा सुनावली गेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड