शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने केले मराठवाड्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:22 IST

भाजप सरकारने व मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात ११ हजार कोटी रुपयांची गुंवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचे काय झाले, भाजप सरकारने मराठवाड्याचे नुकसान केले आहे, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. बीड येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. याप्रसंगी जयंत पाटील हे बोलत होते.

ठळक मुद्देफडणवीसांचा मराठवाड्यावर राग : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भाजप सरकारने व मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात ११ हजार कोटी रुपयांची गुंवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचे काय झाले, भाजप सरकारने मराठवाड्याचे नुकसान केले आहे, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.बीड येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. याप्रसंगी जयंत पाटील हे बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, हा विजयी संकल्प असून, भारतीय जनता पार्टीच्या विर्सजनाची देखील सभा आहे. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे, याच मराठवाड्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी ११ हजार कोटी गुंतवणूक करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र मराठवाड्यातील युवकांना फसवण्याचे काम या देवेंद्र आणि नरेंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे मराठवाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे मराठवाड्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी यावेळी जयंत पाटील यांनी केली. १५ व्या वित्त आयोगाने दिलेल्या अहवालात सांगितले आहे की, विकासाच्या दृष्टीने मराठवाडयातील शेतकरी, युवक, नौकरदार हे मागास आहे. तरी देखील शासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना मराठवाड्याकरता राबवली जात नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे जयंत पाटील म्हणाले.इंधन दरवाढीतही हा दुजाभाव का ?देशात इंधन दरवाढ झाली, त्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले, महागाई वाढली आहे इंधनाचे दर ९० रुपयांच्या पुढे गेले आहेत. यात देखील मराठवाड्यातील नांदेड व परभणीत इतर ठिकाणांपेक्षा इंधन दर अधिक आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्यावर राग असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.बीडमध्ये राष्टÑवादीचे सर्व नेते व्यासपीठावरसोमवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने पहिल्या विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर जिल्ह्यातील सर्व नेते गटबाजी विसरुन एकत्र दिसले. जिल्ह्यातील लोकसभेची एक जागा व विधानसभेच्या सर्व जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या सभेत केला.व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष आ. जयदत्त क्षीरसागर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, उषा दराडे, आ. सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ. रामराव वडकुते, जीवनराव गोरे, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, बाळासाहेब आजबे, विजयसिंह पंडित, जयसिंह सोळंके, राजेंद्र जगताप, रवंीद्र क्षीरसागर, सय्यद सलीम, भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, बजरंग सोनवणे, सुभाष राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.डी झोनमध्ये कायकर्तेजिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थांच्या गर्दीमुळे सभेसाठी बसण्यास जागा नव्हती. त्यामुळे शेकडो श्रोत्यांना उन्हाच्या तडाख्यात उभे रहावे लागले. माजी आ. सय्यद सलीम यांचे भाषण सुरु असताना ही बाब लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पोलिसांना विनंती केली. त्यानंतर उन्हातील कार्यकर्ते, श्रोते डी झोनमध्ये येऊन बसले.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील