शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

Rain in Beed, Ashti: पावसाचे रौद्ररूप : आष्टी तालुक्यात अनेक तलाव ओव्हर फ्लो, नदी नाल्यांना रात्रीत पूर; गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 11:59 IST

महसुल विभागाचे नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली रात्रभर मुसळधार पावसाने अनेक गावांतील नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले तर या जोरदार पावसाचे रौद्ररूप आष्टी तालुक्याने अनुभवले

अविनाश कदम आष्टी ( बीड ) : पावसाअभावी दरवर्षी टंचाईचा सामना करणा-या आष्टी तालुक्याने पावसाचे रौद्ररूप अनुभवले तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला असून मुसळधार पावसाने रात्रीत नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.काही गावांचा संपर्क तुटला आहे.धामणगांव हायवे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.जोरदार पावसाने शेतक-यांचे होत्याचे नव्हते झाले पिकांचे अतोनात नुकसान झाले असून महसूल विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली रात्रभर मुसळधार पावसाने अनेक गावांतील नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले तर या जोरदार पावसाचे रौद्ररूप आष्टी तालुक्याने अनुभवले. तालुक्यातील कडी नदी अनेक दिवसांपासून पूराच्या प्रतिक्षेत असलेल्या कडी नदीला पूर आला असून आष्टी शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रम्हगावचा तलाव ओव्हर फ्लो झाला सुलेमान देवळा येथील नदीला पूर आला आहे. पाणी पुलावरून वाहत आहे तेव्हा सुलेमान देवळा ते सावरगांव या मार्गांवरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रम्हगाव, बेलगांव,निंबोडी,करंजी,क-हेवडगांव, देविनिमगाव,रूटी इमणगाण,कांबळी, गहूखेल,उदखेल,बावी,चोभा निमगांव हे सर्व तलाव एकाच रात्रीत ओव्हर फ्लो होण्याची पहिलीच घटना घडली आहे.अनेक गावातील तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.घरांची पडझड झाली आहे.शेतातील पिके पाण्यात गेले असल्याने शेत जलमय झाले या जोरदार पावसाने पाणी साठ्यात वाढ झाली मात्र, उडिद,तुर,कापूस,सोयाबीन,बाजरी,कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.लागवड केलेला कांदा पाण्यात असून जास्त पावसाने जमिनीचे उत्खनन झाल्याने वाहून गेला आहे.काही शेतक-यांचे काढणीला आलेले उडिद,बाजरी पिक ही पाण्यात भिजत असून अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आष्टी तालुक्यात मागिल २४ तासापासून सर्वदूर पाऊस सुरू असून,या पावसाने बरेच तलाव ओहरफ्लो झाले आहेत.त्यामुळे सांडव्यावरून पाणी पडून नदीला पाणी आलेले आहे.नागरीकांनी या वाहत्या पाण्यावरून तसेच नदीच्या कडेला न जावू नये,तसेच पाऊस सुरू असल्यास शेतातही शेतीच्या कामासाठी न जाता झाडाखाली थांबू नये व कुठे काही आपत्ती आल्यास 9922842001 या क्रमांकावर संपर्क साधावा -राजाभाऊ कदम ( तहसिलदार आष्टी )

 

कडा,धामणगांव,महसूल मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस 

४ सप्टेंबर रोजी चे महसुल मंडळ निहाय पर्जन्यमान 

आष्टी - ८७.१ कडा  - १२६.५टाकळसिंग - २.३दौलावडगांव - ७७.८धामणगांव  - ११९.६धानोरा  - ६८.६पिंपळा  - ८०.३

टॅग्स :Rainपाऊस