शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:56 IST

मस्साजोगच्या ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने लोटले आहेत. आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी पकडले नाही, जे ९ जण अटक आहेत, ते स्वतःहून हजर झालेले आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त नावे सहआरोपी करण्यासाठी दिली गेली, पण काहीच झाले नाही. मुख्यमंत्री दुसऱ्यांदा संतोष देशमुख यांचा बळी घेत आहेत, असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केले आहेत.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "ही वेळ यायलाच नको होती. पण, आता जी वेळ यायला नको होती, ती आलेली आहे. दुर्दैव आहे. गावाला आज न्याय मागावा लागतोय आणि सत्ताधारी फक्त तपास सुरू आहे इतकंच सांगतात."

मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत

"पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बघितलं, तर आहे तेच आरोप आहेत. सगळ्या राज्याला दिसत आहे. नावं सांगितली जातात, पुरावे दिले जातात. पण त्यानंतर प्रक्रिया का होत नाही, ते कळत नाही. कुटुंबांवर ही दुर्दैवी वेळ आहे", अशी खंत मनोज जरांगे यांनी व्यक्त केली. 

"सहआरोपी करण्याची मागणी केली गेली आहे. शंभर-दीडशे नावे आहेत. खंडणी, मारहाण आणि भ्रष्टाचारात असणारे. काही पोलीस आहेत. एक माणूस अटक करायला, पुरावा सापडल्यानंतर ती गोष्ट करायला लावण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलन करावं लागतं. मग, सरकारने तीन महिन्यात नेमकं काय केलं?", असा सवाल मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला केला आहे. 

पकडण्यात आलेल्या एका तरी आरोपीचं नाव सांगा -जरांगे

"ही क्रूर हत्या झालेली आहे. सरकार म्हणतंय की एकालाही सोडलं जाणार नाही. पण, आतापर्यंत धरलंय कोणाला? एखादं नाव तरी आम्हाला सांगा. हे ९ जण तुम्ही धरलेले नाहीत. हे स्वतःहून आलेले आहेत. तु्म्ही आरोपी केलेले नाही. जनतेने आंदोलन केल्यामुळे त्यांची अटक झालेली आहे", असा मुद्दा मांडत जरांगेंनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

जरांगेंकडून सुरेश धसांच्या भूमिकेवर शंका

"तीन महिन्यात एकही सहआरोपी होत नाही. मग सरकारला या प्रकरणाचं नेमकं काय करायचं आहे? हा शोधाचा विषय झालेला आहे. नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तु्म्ही, सरकार तुम्ही आणि तुम्ही आतापर्यंत केलं काय? साधं तुम्हाला आतापर्यंत उज्ज्वल निकम देता आले नाहीत. किरकोळ विषय आहे. मागणी करणारे तुम्ही, मस्साजोगच्या गावकऱ्यांना मुख्यमंत्र्‍यांकडे घेऊन जाणारे तुम्हीच आणि होऊ न देणारे पण तुम्हीच", असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर नाव न घेता केला. 

"तीन महिन्यांपासून सुरू आहे, पण यात आजपर्यंत झालंय काय? तुम्ही सरकार असून, कुटुंबाला उपोषणाला बसायची वेळ आलीये. प्रत्येक वेळी गोड बोलून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीस धरू शकत नाही. सरकार इथं येत आणि तरीही त्यांना उपोषणाची वेळ आलीये. महायुती असो किंवा महाविकास आघाडी यात देशमुख कुटुंबाचा बळी नका घेऊन आणि मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेत आहेत", असे गंभीर विधान मनोज जरांगे यांनी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSantosh Deshmukhसंतोष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीSuresh Dhasसुरेश धस