शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:56 IST

मस्साजोगच्या ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने लोटले आहेत. आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी पकडले नाही, जे ९ जण अटक आहेत, ते स्वतःहून हजर झालेले आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त नावे सहआरोपी करण्यासाठी दिली गेली, पण काहीच झाले नाही. मुख्यमंत्री दुसऱ्यांदा संतोष देशमुख यांचा बळी घेत आहेत, असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केले आहेत.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "ही वेळ यायलाच नको होती. पण, आता जी वेळ यायला नको होती, ती आलेली आहे. दुर्दैव आहे. गावाला आज न्याय मागावा लागतोय आणि सत्ताधारी फक्त तपास सुरू आहे इतकंच सांगतात."

मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत

"पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बघितलं, तर आहे तेच आरोप आहेत. सगळ्या राज्याला दिसत आहे. नावं सांगितली जातात, पुरावे दिले जातात. पण त्यानंतर प्रक्रिया का होत नाही, ते कळत नाही. कुटुंबांवर ही दुर्दैवी वेळ आहे", अशी खंत मनोज जरांगे यांनी व्यक्त केली. 

"सहआरोपी करण्याची मागणी केली गेली आहे. शंभर-दीडशे नावे आहेत. खंडणी, मारहाण आणि भ्रष्टाचारात असणारे. काही पोलीस आहेत. एक माणूस अटक करायला, पुरावा सापडल्यानंतर ती गोष्ट करायला लावण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलन करावं लागतं. मग, सरकारने तीन महिन्यात नेमकं काय केलं?", असा सवाल मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला केला आहे. 

पकडण्यात आलेल्या एका तरी आरोपीचं नाव सांगा -जरांगे

"ही क्रूर हत्या झालेली आहे. सरकार म्हणतंय की एकालाही सोडलं जाणार नाही. पण, आतापर्यंत धरलंय कोणाला? एखादं नाव तरी आम्हाला सांगा. हे ९ जण तुम्ही धरलेले नाहीत. हे स्वतःहून आलेले आहेत. तु्म्ही आरोपी केलेले नाही. जनतेने आंदोलन केल्यामुळे त्यांची अटक झालेली आहे", असा मुद्दा मांडत जरांगेंनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

जरांगेंकडून सुरेश धसांच्या भूमिकेवर शंका

"तीन महिन्यात एकही सहआरोपी होत नाही. मग सरकारला या प्रकरणाचं नेमकं काय करायचं आहे? हा शोधाचा विषय झालेला आहे. नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तु्म्ही, सरकार तुम्ही आणि तुम्ही आतापर्यंत केलं काय? साधं तुम्हाला आतापर्यंत उज्ज्वल निकम देता आले नाहीत. किरकोळ विषय आहे. मागणी करणारे तुम्ही, मस्साजोगच्या गावकऱ्यांना मुख्यमंत्र्‍यांकडे घेऊन जाणारे तुम्हीच आणि होऊ न देणारे पण तुम्हीच", असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर नाव न घेता केला. 

"तीन महिन्यांपासून सुरू आहे, पण यात आजपर्यंत झालंय काय? तुम्ही सरकार असून, कुटुंबाला उपोषणाला बसायची वेळ आलीये. प्रत्येक वेळी गोड बोलून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीस धरू शकत नाही. सरकार इथं येत आणि तरीही त्यांना उपोषणाची वेळ आलीये. महायुती असो किंवा महाविकास आघाडी यात देशमुख कुटुंबाचा बळी नका घेऊन आणि मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेत आहेत", असे गंभीर विधान मनोज जरांगे यांनी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSantosh Deshmukhसंतोष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीSuresh Dhasसुरेश धस