शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

'मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेताहेत'; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:56 IST

मस्साजोगच्या ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने लोटले आहेत. आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी पकडले नाही, जे ९ जण अटक आहेत, ते स्वतःहून हजर झालेले आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त नावे सहआरोपी करण्यासाठी दिली गेली, पण काहीच झाले नाही. मुख्यमंत्री दुसऱ्यांदा संतोष देशमुख यांचा बळी घेत आहेत, असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केले आहेत.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "ही वेळ यायलाच नको होती. पण, आता जी वेळ यायला नको होती, ती आलेली आहे. दुर्दैव आहे. गावाला आज न्याय मागावा लागतोय आणि सत्ताधारी फक्त तपास सुरू आहे इतकंच सांगतात."

मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत

"पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बघितलं, तर आहे तेच आरोप आहेत. सगळ्या राज्याला दिसत आहे. नावं सांगितली जातात, पुरावे दिले जातात. पण त्यानंतर प्रक्रिया का होत नाही, ते कळत नाही. कुटुंबांवर ही दुर्दैवी वेळ आहे", अशी खंत मनोज जरांगे यांनी व्यक्त केली. 

"सहआरोपी करण्याची मागणी केली गेली आहे. शंभर-दीडशे नावे आहेत. खंडणी, मारहाण आणि भ्रष्टाचारात असणारे. काही पोलीस आहेत. एक माणूस अटक करायला, पुरावा सापडल्यानंतर ती गोष्ट करायला लावण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलन करावं लागतं. मग, सरकारने तीन महिन्यात नेमकं काय केलं?", असा सवाल मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला केला आहे. 

पकडण्यात आलेल्या एका तरी आरोपीचं नाव सांगा -जरांगे

"ही क्रूर हत्या झालेली आहे. सरकार म्हणतंय की एकालाही सोडलं जाणार नाही. पण, आतापर्यंत धरलंय कोणाला? एखादं नाव तरी आम्हाला सांगा. हे ९ जण तुम्ही धरलेले नाहीत. हे स्वतःहून आलेले आहेत. तु्म्ही आरोपी केलेले नाही. जनतेने आंदोलन केल्यामुळे त्यांची अटक झालेली आहे", असा मुद्दा मांडत जरांगेंनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

जरांगेंकडून सुरेश धसांच्या भूमिकेवर शंका

"तीन महिन्यात एकही सहआरोपी होत नाही. मग सरकारला या प्रकरणाचं नेमकं काय करायचं आहे? हा शोधाचा विषय झालेला आहे. नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तु्म्ही, सरकार तुम्ही आणि तुम्ही आतापर्यंत केलं काय? साधं तुम्हाला आतापर्यंत उज्ज्वल निकम देता आले नाहीत. किरकोळ विषय आहे. मागणी करणारे तुम्ही, मस्साजोगच्या गावकऱ्यांना मुख्यमंत्र्‍यांकडे घेऊन जाणारे तुम्हीच आणि होऊ न देणारे पण तुम्हीच", असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर नाव न घेता केला. 

"तीन महिन्यांपासून सुरू आहे, पण यात आजपर्यंत झालंय काय? तुम्ही सरकार असून, कुटुंबाला उपोषणाला बसायची वेळ आलीये. प्रत्येक वेळी गोड बोलून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीस धरू शकत नाही. सरकार इथं येत आणि तरीही त्यांना उपोषणाची वेळ आलीये. महायुती असो किंवा महाविकास आघाडी यात देशमुख कुटुंबाचा बळी नका घेऊन आणि मुख्यमंत्री संतोष देशमुखांचा दुसऱ्यांदा बळी घेत आहेत", असे गंभीर विधान मनोज जरांगे यांनी केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSantosh Deshmukhसंतोष देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीSuresh Dhasसुरेश धस