शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सुरक्षेअभावी माजलगाव धरण क्षेत्र ठरत आहे मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:35 IST

माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे.

ठळक मुद्देनेमकी जबाबदारी कोणाची ? : सुरक्षेबाबत अभियंते व पोलिसांची टोलवाटोलवी; गत दहा दिवसांत धरण क्षेत्रात चौघांचे बळी

माजलगाव : माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. या बाबत प्रशासन आणि पोलीस मात्र टोलवाटोलवीची भूमिका घेत आहे.माजलगाव धरणाचे क्षेत्र हे जवळपास १५ किलोमीटर व्यासाचे आहे. मागील बाजूला सुमारे २२ किलोमीटर इतके आहे. माजलगाव शहरात तसेच भोवती जवळपास ११ गावातील जमिनी धरणात गेल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. येथील लोक हे धरण क्षेत्रात सर्रास वावरतात. तसेच कपडे धुण्यासाठी, पोहण्यासाठी येथे येतात.अनेक लोकांना धरणात कोठे खड्डे आहेत किंवा कुठे जास्त पाणी आहे याचा अंदाज आहे. मात्र, नवीन लोकांना याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अनेक घटना येथे घडतात. वास्तविक धरण क्षेत्रामध्ये वावरणे हे शासनाने प्रतिबंधित केलेले आहे. परंतु याचे कुठेही पालन होताना दिसत नाही.माजलगाव धरणात अनेक गावे गेलेली आहेत. त्यामुळे त्या गावातील असणाऱ्या विहिरीदेखील धरणाच्या पाण्याखाली आहेत. तसेच रस्त्याच्या कामासाठी धरणाच्या पाण्याकडील बाजूस मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन देखील झालेले आहे. त्याचे देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व त्यात पाणी साचून त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही.गत दहा दिवसात धरण क्षेत्रात बुडून चौघांचा बळी गेला. त्याला कारणीभूत ते स्वत: जितके आहेत तितकीच यंत्रणा देखील आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर असतानाही यंत्रणेची कसलीही नजर यावर नाही. त्यामुळे यंत्रणा देखील यात दोषी आहे. धरण क्षेत्रात सुरक्षा वाढविण्यावर तसेच प्रतिबंधित क्षेत्रावरील वावर बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.धरण अभियंता व पोलिसांकडून सुरक्षेवरून टोलवाटोलवीअभियंता राजेंद्र दहातोंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडे असते. त्यामुळे सुरक्षेबाबत आमचा कोणताही हस्तक्षेप नसतो.दुसरीकडे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले की, आमच्यावर धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी असली तरी धरण क्षेत्राची जबाबदारी मात्र धरण अभियंता यांची आहे.दोन्ही अधिकारी अशा पद्धतीने एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असल्याने जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरण