शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

सुरक्षेअभावी माजलगाव धरण क्षेत्र ठरत आहे मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:35 IST

माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे.

ठळक मुद्देनेमकी जबाबदारी कोणाची ? : सुरक्षेबाबत अभियंते व पोलिसांची टोलवाटोलवी; गत दहा दिवसांत धरण क्षेत्रात चौघांचे बळी

माजलगाव : माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. या बाबत प्रशासन आणि पोलीस मात्र टोलवाटोलवीची भूमिका घेत आहे.माजलगाव धरणाचे क्षेत्र हे जवळपास १५ किलोमीटर व्यासाचे आहे. मागील बाजूला सुमारे २२ किलोमीटर इतके आहे. माजलगाव शहरात तसेच भोवती जवळपास ११ गावातील जमिनी धरणात गेल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. येथील लोक हे धरण क्षेत्रात सर्रास वावरतात. तसेच कपडे धुण्यासाठी, पोहण्यासाठी येथे येतात.अनेक लोकांना धरणात कोठे खड्डे आहेत किंवा कुठे जास्त पाणी आहे याचा अंदाज आहे. मात्र, नवीन लोकांना याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अनेक घटना येथे घडतात. वास्तविक धरण क्षेत्रामध्ये वावरणे हे शासनाने प्रतिबंधित केलेले आहे. परंतु याचे कुठेही पालन होताना दिसत नाही.माजलगाव धरणात अनेक गावे गेलेली आहेत. त्यामुळे त्या गावातील असणाऱ्या विहिरीदेखील धरणाच्या पाण्याखाली आहेत. तसेच रस्त्याच्या कामासाठी धरणाच्या पाण्याकडील बाजूस मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन देखील झालेले आहे. त्याचे देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत व त्यात पाणी साचून त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही.गत दहा दिवसात धरण क्षेत्रात बुडून चौघांचा बळी गेला. त्याला कारणीभूत ते स्वत: जितके आहेत तितकीच यंत्रणा देखील आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर असतानाही यंत्रणेची कसलीही नजर यावर नाही. त्यामुळे यंत्रणा देखील यात दोषी आहे. धरण क्षेत्रात सुरक्षा वाढविण्यावर तसेच प्रतिबंधित क्षेत्रावरील वावर बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.धरण अभियंता व पोलिसांकडून सुरक्षेवरून टोलवाटोलवीअभियंता राजेंद्र दहातोंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडे असते. त्यामुळे सुरक्षेबाबत आमचा कोणताही हस्तक्षेप नसतो.दुसरीकडे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणाले की, आमच्यावर धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी असली तरी धरण क्षेत्राची जबाबदारी मात्र धरण अभियंता यांची आहे.दोन्ही अधिकारी अशा पद्धतीने एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असल्याने जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरण