शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

माजलगावचा कचरा केसापुरीच्या नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : शहरातील स्वच्छता करून जमा झालेला कचरा केसापूर येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : शहरातील स्वच्छता करून जमा झालेला कचरा केसापूर येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी टेंडर काढलेले आहे. तरीही संबंधित ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. हा कचरा ग्राउंडमध्ये न टाकता सिंदफणा नदीपात्रानजीक कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. याकडे मात्र माजलगाव नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

माजलगाव शहरात स्वच्छता करून शहरातील सर्व कचरा केसापुरी येथील डंपिंग ग्राउंडवर टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिकेने पावणेदोन कोटी रुपये खर्च करून टेंडर काढले होते. सुरुवातीचे एक-दीड महिना संबंधित ठेकदाराने काम सुरळीत केले. त्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवत त्यांनी मनमानी सुरू केली. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी हा कचरा जाळून टाकला. त्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे करून तो कचरा टाकण्यात येत होता. यामुळे आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य खराब होईल. यामुळे केसापुरी येथील नागरिकांनी विरोध केला होता.

आता तर या ठेकेदाराने मागील चार वर्षांपासून शहरात गोळा केलेला कचरा डंपिंग ग्राउंड घेऊन जाण्याऐवजी तो कचरा सिंदफणा नदीपात्राच्या बाजूला टाकत आहेत. हा कचरा नदीपात्राशेजारी टाकल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस पडताच हा सर्व कचरा सिंदफणा नदीपात्रात पाण्यासोबत वाहून गेल्यास नदीपात्रातदेखील दुर्गंधी पसरून पाणी घाण होणार आहे.

या नदीपात्रात दररोज शहरातील अनेकजण पाणी पितात, तर अनेकजण या नदीपात्रात अंघोळदेखील करीत असतात. या घाणीमुळे पाणी अशुद्ध झाल्यास अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. असे असताना नगरपालिकेचे पदाधिकारी संबंधित ठेकेदाराला समज देण्याऐवजी त्यास प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

....

कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला सिंदफणा नदीपात्राशेजारी टाकण्यात आलेला कचरा उचलून घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे. दोन दिवसांत संपूर्ण कचरा उचलण्यात येईल.

-विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगरपालिका माजलगाव.

===Photopath===

280521\img_20210527_133738_14.jpg~280521\img_20210413_112529_14.jpg

===Caption===

माजलगाव शहरातील कचरा केसापुरी येथील सिंदफणा नदीपात्रात टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.