शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

माजलगाव जलविद्युत केंद्राला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:19 AM

माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली. परंतु पुढील दोन-तीन वर्ष कार्यान्वित राहिल्यानंतर मागील सात ते आठ वर्षांपासून हा जलविद्युत केंद्र केवळ यंत्र समुग्रीची योग्य देखभाल न केल्यामुळे बंद आहे.धरणातून उजव्या कालव्याद्वारे किमान ५ ते ६ पाणीपाळ्या शेतकºयांना सिंचनासाठी दरवर्षी दिल्या जातात. तसेच परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला देखील आवश्यकतेनुसार पाणी दिले जाते. वाहून जाणाºया या पाण्याचा वापर व्हावा,या हेतूने येथे जलविद्युत केंद्राची उभारणी झाली. या ठिकाणी ७५० के.व्ही. क्षमतेचे तीन संच आहेत. पैकी संच क्र. १ हा पहिल्याच वर्षी निकामी झाला तर संच क्र.२ चे द्रवचलित उच्चलक हे निकामी झाले. त्यामुळे संच ३ मध्ये बिघाड झाल्यानंतर त्याचे साहित्य वापरल्यामुळे संच २ देखील बंद पडला. २०११ मध्ये येथील चालू असलेल्या एकमेव संचावरच वीज निर्मिती केवळ नावापुरतीच झाली. त्या नंतर मात्र २०११ पासून संपूर्ण जलविद्युत केंद्रच बंद पडलेले आहे.येथील यंत्र सामुग्रीची अवस्था भंगारात घालण्याजोगी झाली असून, आता कितीही खर्च केला तरी जलविद्युत केंद्र कार्यान्वित होईल अथवा नाही या बाबत शंकाच आहे.येथील सुरक्षा वाºयावर असून, रात्री तर सोडाच; दिवसादेखील या ठिकाणी वॉचमन अथवा कर्मचारी नसतो तरीही येथील सुरक्षेच्या नावावर खर्च केला जात असल्याची माहिती समोर आहे. अधिकाºयांनी भ्रष्टाचार चालविल्याच्या तक्रारी आहेत.तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटावा म्हणून जलसंपदा खात्याने २५ वर्षापूर्वी या वीजनिर्मिती प्रकल्पावर करोडो खर्च करत धरणावर प्रकल्प उभा केला. तेवढा खर्च देखील निघाला नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे ७-८ वर्षात एक युनिटही वीज तयार झाली नाही.गोदावरी जलविद्युत, उपसा सिंचन विभागाचे येथील शाखा अभियंता नितीन जोगळेकर यांच्याशी संपर्क केला असता, ‘मला काहीही माहिती सांगता येणार नाही, तुम्ही औरंगाबादला या’ म्हणत टाळाटाळ केली. तर कार्यकारी अभियंता डी.एस. तडवी यांनी देखील असेच उत्तर देऊन येथे चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत कानावर हात ठेवला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBeedबीड