शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

महावितरण नरमले; शेतकऱ्यांकडून सकाळी अधिकाऱ्यांना घेराव, दुपारनंतर वीज पुरवठा सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 19:18 IST

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महावितरण नरमले असून दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला

- नितीन कांबळे कडा ( बीड) : कसलीही पूर्व सूचना न देता महावितरणने थकीत वीजबिलापोटी टाकळी अमिया येथील सबस्टेशनवरून पाच गावांचा वीजपुरवठा खंडीत केला होता. याविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज  सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. यामुळे नरमलेल्या महावितरणाने आज दुपारनंतर तत्काळ वीज पुरवठा सुरळीत  केला. 

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही.सबस्टेशनवरून रूईनालकोल, सराटेवडगांव, नांदा, टाकळी अमिया, चोभानिमगाव या गावांना वीजपुरवठा होतो. थकीत बिलापोटी महावितरणाने या गावातील वीज पुरवठा चार ते पाच दिवसांपासून खंडीत केला. सध्या पेरणीचे दिवस आहेत. तर काही ठिकाणी पेरणी झालेली आहे. यामुळे गहु, ज्वारी, कांदा, हरभरा आदी रब्बी पिके धोक्यात आली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही.सबस्टेशन गाठले. अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांनी जाब विचारला.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महावितरण नरमले असून दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.  आंदोलनात ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. राम बोडखे, डाॅ.शिवाजी शेंडगे, अमोल शितोळे, पिनु चौधरी, सावता ससाणे, मधुकर गिर्हे, अशोक चौधरी, शिवाजी भवर, अशोक एकशिंगे, श्रीरंग चौधरी, तात्यासाहेब नालकोल, आजिनाथ नालकोल, पांडुरंग धोंडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आधीच खरीप हंगाम अतिवृष्टीने हातच गेला आहे. आता रब्बी हंगामाकडे शेतकरी आस लावून आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीBeedबीडmahavitaranमहावितरण