शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Maharashtra Election 2019 : प्रशासनाची दमदार कामगिरी; पुरात अडकलेल्या मतदारांना होडीच्या सहाय्याने आणले केंद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 19:06 IST

सकाळी ८ पर्यंत ६४ मि. मी. पावसाची नोंद झाली.

बीड : माजलगाव विधानसभा मतदारसंघातील वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने भीम नाईक तांडा येथील ६५ मतदार पुरात अडकले. त्यांना वडवणी तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने होडीच्या सहाय्याने मतदान केंद्रावर आणत मतदानाचा हक्क बजावण्यात मदत केली.तत्काळ कार्यवाही करत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यात मदत केल्याने तहसीलदार सुरेखा स्वामी व यांच्या पथकाचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय पांडे यांनी अभिनंदन केले. 

जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी  मतदानाच्या दिवशीसुद्धा काही मतदार संघात सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. माजलगाव विधानसभा मतदारसंघातील खळवट निमगाव येथे सकाळी ८ पर्यंत ६४ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे देव नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. भीम नाईक तांडा येथील जवळपास ६५ मतदारांना पूर वाढल्याने मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास अडथळा येत होता. येथील केवळ १४ मतदारांनी पूर येण्याच्या आधी मतदान केले होते. 

अनेक मतदार पुरात अडकल्याची माहिती वडवणीच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मदतीने मदतकार्य सुरु केले. देवगाव येथील भोई समाजाच्या काही नागरिकांकडून थर्माकोलची होडी (चप्पू) घेतली व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले. यानंतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदारांनी तहसीलदार स्वामी आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. याबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांवBeedबीडTahasildarतहसीलदार