शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्ड फ्लू’च्या संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन लाेकमत न्यूज नेटवर्क बीड : बर्ड फ्लूच्या संकटामुळे कोंबडीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे ...

नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लाेकमत न्यूज नेटवर्क

बीड : बर्ड फ्लूच्या संकटामुळे कोंबडीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून बीड जिल्ह्यातील लहान शेतकरी व तरुण कोंबडी पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. बर्ड फ्लूच्या केवळ अफवेमुळे आज ७० ते ७५ रुपये किलोने तयार होणारी कोंबडी ३० ते ४० रुपये किलोने विकण्याची वेळ कुक्कुटपालकांवर आली आहे. पर्यायाने हा व्यवसाय मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली असून, यापूर्वीही कोरोनाच्या अफवेमुळे १० ते २० रुपये किलो दराने कोंबडी विकली होती. मागील काही दिवसांपासून बाजार सुधारला होता, तर आता बर्ड फ्लूच्या संकटामुळे आम्ही कोंबडी उत्पादक फक्त अफवेचेच बळी ठरत आहोत. सरकारने पशुसंवर्धन विभागामार्फत नुकसानाचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे. यावेळी गणेश राऊत, अजीज कुरेशी, बालू सालगुडे, नीलेश मस्के, हरून पठाण, शेख निसार, सचिन जगताप, गणेश ढोरमारे, विष्णू लहाने, अनिल शिंदे, राज महंमद, शेख नदीम, सतीश सालगुडे, राज बागलाने, शिवाजी साखरे, बाळू जगताप, यांच्यासह भांडारवाडी, नेकनूर, अंधापुरी, पालवन, कलसंबर, मांजरसुंबा येथील शेतकरी उपस्थित होते.