शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

‘नेटकऱ्यां’चा ‘हायटेक’ प्रचार, अनेक उमेदवारांसाठी ठरतोय धोक्याची घंटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 19:26 IST

सोशल मीडियातून बदनामीच्या पोस्ट होताहेत शेअर  

बीड : सोशल मेडिया प्रभावी व सहज उपलब्ध झालेले माध्यम झाल्यामुळे निवडणुकीत उभे राहिलेल्या सर्व उमेदवरांचा प्रचार हा सोशल मीडिया साईटवरुन जोरात सुरु आहे. तसेच ज्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या किंवा चांगल्या कामांचे कौतुक करायचे असेल ते देखील मुक्तपणे करता येत आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या सोशल मीडिया सेलकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराची बदनामी होईल अशा पोस्ट शेयर केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक वेळा प्रचाराची पातळी ही खालावत असल्याचे दिसून येत आहे. 

मात्र, तरी देखील सोशल मीडियाला सुद्धा आचारसंहितेचे नियम लागू आहेत आणि निवडणूक विभाग व इतर संबंधीत विभागांची सोशल मीडियावर करडी नजर आहे. चुकीच्या पोस्ट किंवा समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर दिसला तर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. पूर्वीच्या काळी एकमेकांशी थेट बोलून केलेला प्रचार अधिक प्रभावी ठरत असे, त्याला आपण ‘माऊथ टू माऊथ’ असे म्हणतो आणि या प्रचाराचा प्रभाव हा सभेपेक्षा सुद्धा जास्त प्रभावी ठरतो, असे तज्ज्ञ सांगतात. परंतु आजच्या व्यस्त जीवनामध्ये सोशल मीडियाचा वापर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

अगदी गाव, वाड्या वस्त्यांवरील तरुणांच्या हातात मोबाईल व इंटरनेट पोहचल्यामुळे ते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. २०१४ साली देखील सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करण्यात आला मात्र, त्यावेळी इंटरनेट सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता, त्या तुलनेत २०१९ या वर्षात इंटरनेट यंत्रणेचा विस्तार झाला असून गावोगावी मोबाईलसेवा उपलब्ध झाली आहे. 

पूर्वी प्रचाराची साधने हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मर्यादित होती़ आता मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘नेटकरी’ कार्यकर्ते प्रचार पेरणी मोठ्या वेगाने करत आहेत़  त्यामुळे एकाचवेळी अनेकांपर्यंत पोहोचता येणे शक्य होते़  प्रचाराची ही ‘हायटेक’ यंत्रणा अधिक प्रभावी ठरत आहे़ मात्र, असे असले तरी जी हायटेक यंत्रणा प्रचारात उभी आहे ती जिल्ह्याच्या विकासात आली पाहिजे अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे़ 

सोशल मीडियाचा गैरवापर वाढतोयसोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या माध्यमातून एखाद्या उमेदवाराची बदनामी ही कमी वेळेत मोठ्या प्रमाणात होते. तसेच अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख लपवून फेक अकाऊंटवरुन पोस्ट व इतर मजकूर  टाकून देखील प्रतिस्पर्ध्यांची बदनामी केली जाते, या कामासाठी अनेक राजकीय पक्षांनी मीडिया सेलची निर्मिती केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019