शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सूट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जनता शासन-प्रशासन लावत असलेल्या लॉकडाऊनला सातत्याने सामोरे जात आहे. यामुळे छोटे-छोटे उद्योग व्यवसाय करणारे, मोलमजुरी ...

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जनता शासन-प्रशासन लावत असलेल्या लॉकडाऊनला सातत्याने सामोरे जात आहे. यामुळे छोटे-छोटे उद्योग व्यवसाय करणारे, मोलमजुरी करणारे, भाजीपाला-फळफळावळ विक्री करणारे, रिक्षाचालक, हातगाडी चालक, या सर्वांचे कंबरडे मोडले आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, मोठमोठे उद्योजक आणि नोकरपेशा लोक सोडले तर सर्वजण आर्थिकदृष्ट्या पार खचून गेले आहे. अशा अवस्थेमध्ये यापुढे बारा तासांपेक्षा जास्त लॉकडाऊन कोणालाही परवडणारे नाही. शासन बरहुकुम प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वेळोवेळी लॉकडाऊनचा आदेश देऊन सर्वसामान्य गोरगरिबांची आर्थिक कोंडी करत आहे.

या बाबीकडे शासनकर्त्यांसह प्रशासनानेही लक्ष देणे आवश्यक आहे. याकडे शासन-प्रशासन हवे तसे लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे जनतेमध्ये हळूहळू शासन-प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. जर खिशात पैसा नसेल तर लोक कसे जगतील? आवश्यक नियम व निर्बंधाचे सक्तीने पालन करणे आणि जनतेकडून करून घेणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे. प्रत्येकाला मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर वगैरे बाबींची पूर्तता करून या महामारीला आटोक्यात आणता येऊ शकते तर मग लोकांचे उद्योगधंदे, कामे बंद करून लॉकडाऊन करून काय हशील आहे? याचा विचार व्हावा, अशी मागणी शेख मतीन यांनी

केली आहे.