शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सूट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जनता शासन-प्रशासन लावत असलेल्या लॉकडाऊनला सातत्याने सामोरे जात आहे. यामुळे छोटे-छोटे उद्योग व्यवसाय करणारे, मोलमजुरी ...

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जनता शासन-प्रशासन लावत असलेल्या लॉकडाऊनला सातत्याने सामोरे जात आहे. यामुळे छोटे-छोटे उद्योग व्यवसाय करणारे, मोलमजुरी करणारे, भाजीपाला-फळफळावळ विक्री करणारे, रिक्षाचालक, हातगाडी चालक, या सर्वांचे कंबरडे मोडले आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, मोठमोठे उद्योजक आणि नोकरपेशा लोक सोडले तर सर्वजण आर्थिकदृष्ट्या पार खचून गेले आहे. अशा अवस्थेमध्ये यापुढे बारा तासांपेक्षा जास्त लॉकडाऊन कोणालाही परवडणारे नाही. शासन बरहुकुम प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वेळोवेळी लॉकडाऊनचा आदेश देऊन सर्वसामान्य गोरगरिबांची आर्थिक कोंडी करत आहे.

या बाबीकडे शासनकर्त्यांसह प्रशासनानेही लक्ष देणे आवश्यक आहे. याकडे शासन-प्रशासन हवे तसे लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे जनतेमध्ये हळूहळू शासन-प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. जर खिशात पैसा नसेल तर लोक कसे जगतील? आवश्यक नियम व निर्बंधाचे सक्तीने पालन करणे आणि जनतेकडून करून घेणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे. प्रत्येकाला मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर वगैरे बाबींची पूर्तता करून या महामारीला आटोक्यात आणता येऊ शकते तर मग लोकांचे उद्योगधंदे, कामे बंद करून लॉकडाऊन करून काय हशील आहे? याचा विचार व्हावा, अशी मागणी शेख मतीन यांनी

केली आहे.