शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२ लाख शेतकरी कर्जमुक्त करणार; मुख्यमंत्र्यांची बीड जिल्ह्यात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड / वडवणी : भाजप सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील २ लाख शेतकºयांना कर्जमुक्त ...

ठळक मुद्दे ८०० कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले जातील

लोकमत न्यूज नेटवर्कबीड / वडवणी : भाजप सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील २ लाख शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल. त्यासाठी ८०० कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले जातील, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथे कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेल्या ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन, जलवितरण व बंद नलिका प्रणाली कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यानंतर वडवणी शहरात जिल्ह्यातील सर्व सरपंचांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, वडवणीच्या नगराध्यक्षा मंगला मुंडे, आ.विनायक मेटे, आ.आर.टी. देशमुख, आ.भिमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.संगीता ठोंबरे, माजी आ. बदामराव पंडित, केशव आंधळे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ए.पी. कोहीरकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एच.ए.ढंगारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एम.व्ही. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता ए.आर.जाधव, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे फडणवीस म्हणाले, जनतेतून नगराध्यक्ष निवडून दिला जातो तसाच सरपंचही निवडून यावा या संदर्भात आम्ही निर्णय घेतला. परंतु विरोधी पक्षाने आम्हाला विरोध केला. हा विरोध मोडून काढत सरपंच थेट जनतेतून निवडला. आज समजले की विरोधी पक्ष का या निर्णयाला विरोध करत होते. याचे उत्तर जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतींपैकी ४०० ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले. याचीच त्यांना भीती होती. अनेकांनी दावे-प्रतिदावे केले. त्यांना दाखवण्यासाठी व आमचे सरपंच मोजण्यासाठी प्रत्येक सरपंचाला फेटे बांधले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. मेळाव्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, बाबूराव पोटभरे, संतोष हंगे, डीसीसी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे आदींची उपस्थिती होती.

जादूची कांडी फिरवून जिल्हा परिषदेत सत्ता - पंकजा मुंडेमागील अनेक वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. परंतु या वेळेस आपण जादूची कांडी फिरवली आणि १५ वर्षानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा राहिला. याला व्यासपीठावरील सर्व आमदार साक्षी आहेत. सध्या जिल्ह्यातील चित्र बदलत आहे. पूर्वी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले होते. परंतु आता हेच उलट होत आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कोणीही गर्वात राहू नये. भाजप नेहमीच एक पाऊल पुढे आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जमत नाही अशी अफवा विरोधकांनी उठवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जमत नसते तर आज मी या पदावर नसते, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला. जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २०१५ साली बैठक घेतली. याला मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेचे काम सुरु आहे. मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने माझ्यासह सर्व बीड जिल्ह्यातील जनतेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने स्वाभिमान जपत कमळाला साथ दिली, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

बंद पाईपलाईनद्वारे पाणी वितरण - गिरीश महाजनपूर्वी प्रत्येक प्रकल्पातून सोडलेले पाणी उघड्या कालव्यातून जात होते. त्यामुळे शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोहचताना तब्बल ५० ते ६० टक्के पाण्याचा अपव्यय होतो.हे टाळण्यासाठी राज्यात यापुढे प्रत्येक कॅनॉलद्वारे सोडलेले पाणी बंद पाईपद्वारे जाईल यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्यांमध्ये जमीन सुजलाम् सुफलाम् करण्याचा आमचा संकल्प आहे.तसेच अरणवाडी, टेंबे, सारणी सांगवी, तांदळवाडी घाट येथील कालव्याचे कामे केली लवकरच पूर्ण केली जातील, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. येणाºया सात महिन्यात वडवणी तालुक्यातील शेतकºयांना बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३१९ कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. यामुळे २८०० हेक्टर शेती सिंचनाखाली येईल असा विश्वासही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.