शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

२ लाख शेतकरी कर्जमुक्त करणार; मुख्यमंत्र्यांची बीड जिल्ह्यात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड / वडवणी : भाजप सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील २ लाख शेतकºयांना कर्जमुक्त ...

ठळक मुद्दे ८०० कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले जातील

लोकमत न्यूज नेटवर्कबीड / वडवणी : भाजप सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील २ लाख शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल. त्यासाठी ८०० कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले जातील, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथे कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेल्या ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन, जलवितरण व बंद नलिका प्रणाली कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यानंतर वडवणी शहरात जिल्ह्यातील सर्व सरपंचांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, वडवणीच्या नगराध्यक्षा मंगला मुंडे, आ.विनायक मेटे, आ.आर.टी. देशमुख, आ.भिमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.संगीता ठोंबरे, माजी आ. बदामराव पंडित, केशव आंधळे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ए.पी. कोहीरकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एच.ए.ढंगारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एम.व्ही. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता ए.आर.जाधव, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे फडणवीस म्हणाले, जनतेतून नगराध्यक्ष निवडून दिला जातो तसाच सरपंचही निवडून यावा या संदर्भात आम्ही निर्णय घेतला. परंतु विरोधी पक्षाने आम्हाला विरोध केला. हा विरोध मोडून काढत सरपंच थेट जनतेतून निवडला. आज समजले की विरोधी पक्ष का या निर्णयाला विरोध करत होते. याचे उत्तर जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतींपैकी ४०० ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले. याचीच त्यांना भीती होती. अनेकांनी दावे-प्रतिदावे केले. त्यांना दाखवण्यासाठी व आमचे सरपंच मोजण्यासाठी प्रत्येक सरपंचाला फेटे बांधले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. मेळाव्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, बाबूराव पोटभरे, संतोष हंगे, डीसीसी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे आदींची उपस्थिती होती.

जादूची कांडी फिरवून जिल्हा परिषदेत सत्ता - पंकजा मुंडेमागील अनेक वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. परंतु या वेळेस आपण जादूची कांडी फिरवली आणि १५ वर्षानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा राहिला. याला व्यासपीठावरील सर्व आमदार साक्षी आहेत. सध्या जिल्ह्यातील चित्र बदलत आहे. पूर्वी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले होते. परंतु आता हेच उलट होत आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कोणीही गर्वात राहू नये. भाजप नेहमीच एक पाऊल पुढे आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जमत नाही अशी अफवा विरोधकांनी उठवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जमत नसते तर आज मी या पदावर नसते, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला. जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २०१५ साली बैठक घेतली. याला मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेचे काम सुरु आहे. मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने माझ्यासह सर्व बीड जिल्ह्यातील जनतेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने स्वाभिमान जपत कमळाला साथ दिली, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

बंद पाईपलाईनद्वारे पाणी वितरण - गिरीश महाजनपूर्वी प्रत्येक प्रकल्पातून सोडलेले पाणी उघड्या कालव्यातून जात होते. त्यामुळे शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोहचताना तब्बल ५० ते ६० टक्के पाण्याचा अपव्यय होतो.हे टाळण्यासाठी राज्यात यापुढे प्रत्येक कॅनॉलद्वारे सोडलेले पाणी बंद पाईपद्वारे जाईल यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्यांमध्ये जमीन सुजलाम् सुफलाम् करण्याचा आमचा संकल्प आहे.तसेच अरणवाडी, टेंबे, सारणी सांगवी, तांदळवाडी घाट येथील कालव्याचे कामे केली लवकरच पूर्ण केली जातील, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. येणाºया सात महिन्यात वडवणी तालुक्यातील शेतकºयांना बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३१९ कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. यामुळे २८०० हेक्टर शेती सिंचनाखाली येईल असा विश्वासही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.