शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

प्रेमाने केले आयुष्य आंधळे; दोघांच्या वादात जळाल्याने ४ वर्षे १० महिन्यांपासून तरुणी खिळली अंथरुणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 12:05 IST

दोघांच्या वादात जळाल्याने तरुणी ८० टक्के भाजली.

ठळक मुद्देतारुण्याची नशा; जीवनाची दुर्दशा  पालक, नातेवाईकांनी ढुंकूनही पाहिले नाही

- सोमनाथ खताळ  

बीड : प्रेम आंधळं, प्रामाणिक आणि नि:स्वार्थीही असते. परंतु हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. कुटुंबाचा विरोध झुगारून एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळवणे एका तरुणीला चांगलेच अंगलट आले. दोघांच्या वादात जळाल्याने ती ८० टक्के भाजली. चार वर्षे १० महिने ११ दिवस अंथरुणावर खिळून राहिल्यावर तिला आता हक्काची ‘सावली’ मिळणार आहे. 

सोनाली (नाव बदलले, वय २७) ही साधारण ११ वी च्या वर्गात असताना गावातील शेजारी राहणाऱ्या सुनीलसोबत तिची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. आयुष्यभराची साथ देण्यासाठी त्यांना जात आडवी आली. घरच्यांचा विरोध झाल्याने तिने गाव सोडून जालना गाठले. औरंगाबादला नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात नोकरी सुरू केली. सुनील गावाकडून येणे जाणे करीत असे. विवाह झाला नसला तरी ते एकत्रच राहत होते, असे सांगण्यात आले. दरम्यान, १९ मार्च २०१५ या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुनील मद्यपान करून सोनालीच्या खोलीवर आला. दोघांमध्ये संशयावरून वाद झाले. सुनीलने मारहाण केली. सोनालीला राग अनावर झाला आणि तिने पेट्रोल टाकून दुचाकी पेटविली. आग भडकल्याने दुचाकीचे सायलन्सर फुटून स्फोट झाला. यात सोनाली  ८० टक्के भाजली.

सुनीलने नशेतच तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याने प्रेमाची शपथ घालून तक्रार देऊ नको, म्हणून अट घातली. सोनाली प्रेमाला प्रामाणिक राहिली. तिने त्याच्याविरोधात तक्रार दिली नाही; परंतु  सुनीलने तिचा हात सोडला. जळाल्यानंतर सहा महिने औरंगाबाद, त्यानंतर  पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्ष, पुन्हा मुंबईच्या जे जे रुग्णालयात शस्त्रक्रियासाठी एक वर्ष आणि परत जिल्हा रुग्णालयात, असा तिचा हा प्रवास तब्बल ४ वर्षे १० महिने ११ दिवसांचा  (२९ जानेवारी २०२० पर्यंत) राहिला. आता तिला दोन दिवसांत कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरला पाठविले जाणार आहे.  सुनीलचा मात्र, अद्यापही थांगपत्ता नसल्याचे समजते.

पालक, नातेवाईकांनी ढुंकूनही पाहिले नाहीसोनालीला आई-वडिलांसह एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. ही दुसऱ्या क्रमांकाची. घर सोडल्यापासून तिला कोणीच बोलले किंवा भेटले नाही. जळाल्यानंतरही साधा एक फोनही कुटुंब किंवा नातेवाईकांनी केला नसल्याचे सोनाली सांगते. 

अनेकांची मदतमाजी मंत्री बदामराव पंडित यांनी  जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यापासून ते मुंबईतील शस्त्रक्रिया करण्यापर्यंतच खर्च आणि देखभाल पंडित यांनी केल्याचे सोनाली सांगते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे, परिचारिका संगीता दिंडकर व त्यांच्या टीमने सोनालीची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतली.

सोनालीला कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरला पाठविण्याची सर्व तयारी झाली आहे. प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन दिवसांत तिला पाठविले जाईल. नातेवाईक, कुटुंब कोणीही तिला भेटायला आले नसल्याने आम्ही पुढाकार घेतला. - तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड

टॅग्स :Beedबीडfireआगhospitalहॉस्पिटल