शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

प्रेमाने केले आयुष्य आंधळे; दोघांच्या वादात जळाल्याने ४ वर्षे १० महिन्यांपासून तरुणी खिळली अंथरुणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 12:05 IST

दोघांच्या वादात जळाल्याने तरुणी ८० टक्के भाजली.

ठळक मुद्देतारुण्याची नशा; जीवनाची दुर्दशा  पालक, नातेवाईकांनी ढुंकूनही पाहिले नाही

- सोमनाथ खताळ  

बीड : प्रेम आंधळं, प्रामाणिक आणि नि:स्वार्थीही असते. परंतु हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. कुटुंबाचा विरोध झुगारून एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळवणे एका तरुणीला चांगलेच अंगलट आले. दोघांच्या वादात जळाल्याने ती ८० टक्के भाजली. चार वर्षे १० महिने ११ दिवस अंथरुणावर खिळून राहिल्यावर तिला आता हक्काची ‘सावली’ मिळणार आहे. 

सोनाली (नाव बदलले, वय २७) ही साधारण ११ वी च्या वर्गात असताना गावातील शेजारी राहणाऱ्या सुनीलसोबत तिची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. आयुष्यभराची साथ देण्यासाठी त्यांना जात आडवी आली. घरच्यांचा विरोध झाल्याने तिने गाव सोडून जालना गाठले. औरंगाबादला नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात नोकरी सुरू केली. सुनील गावाकडून येणे जाणे करीत असे. विवाह झाला नसला तरी ते एकत्रच राहत होते, असे सांगण्यात आले. दरम्यान, १९ मार्च २०१५ या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुनील मद्यपान करून सोनालीच्या खोलीवर आला. दोघांमध्ये संशयावरून वाद झाले. सुनीलने मारहाण केली. सोनालीला राग अनावर झाला आणि तिने पेट्रोल टाकून दुचाकी पेटविली. आग भडकल्याने दुचाकीचे सायलन्सर फुटून स्फोट झाला. यात सोनाली  ८० टक्के भाजली.

सुनीलने नशेतच तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याने प्रेमाची शपथ घालून तक्रार देऊ नको, म्हणून अट घातली. सोनाली प्रेमाला प्रामाणिक राहिली. तिने त्याच्याविरोधात तक्रार दिली नाही; परंतु  सुनीलने तिचा हात सोडला. जळाल्यानंतर सहा महिने औरंगाबाद, त्यानंतर  पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्ष, पुन्हा मुंबईच्या जे जे रुग्णालयात शस्त्रक्रियासाठी एक वर्ष आणि परत जिल्हा रुग्णालयात, असा तिचा हा प्रवास तब्बल ४ वर्षे १० महिने ११ दिवसांचा  (२९ जानेवारी २०२० पर्यंत) राहिला. आता तिला दोन दिवसांत कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरला पाठविले जाणार आहे.  सुनीलचा मात्र, अद्यापही थांगपत्ता नसल्याचे समजते.

पालक, नातेवाईकांनी ढुंकूनही पाहिले नाहीसोनालीला आई-वडिलांसह एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. ही दुसऱ्या क्रमांकाची. घर सोडल्यापासून तिला कोणीच बोलले किंवा भेटले नाही. जळाल्यानंतरही साधा एक फोनही कुटुंब किंवा नातेवाईकांनी केला नसल्याचे सोनाली सांगते. 

अनेकांची मदतमाजी मंत्री बदामराव पंडित यांनी  जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यापासून ते मुंबईतील शस्त्रक्रिया करण्यापर्यंतच खर्च आणि देखभाल पंडित यांनी केल्याचे सोनाली सांगते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे, परिचारिका संगीता दिंडकर व त्यांच्या टीमने सोनालीची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतली.

सोनालीला कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरला पाठविण्याची सर्व तयारी झाली आहे. प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन दिवसांत तिला पाठविले जाईल. नातेवाईक, कुटुंब कोणीही तिला भेटायला आले नसल्याने आम्ही पुढाकार घेतला. - तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड

टॅग्स :Beedबीडfireआगhospitalहॉस्पिटल