शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जमीन, जोडणी नाही, तरीदेखील कृषिपंपाचे सव्वालाख वीज बिल भूमिहीन शेतकऱ्याच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST

नांदूरघाट : महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे वीज कोटेशन भरले. ...

नांदूरघाट : महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे वीज कोटेशन भरले. वीज जोडणी मिळेना म्हणून परेशान होऊन जमीन विक्री केली व भूमिहीन झाला. तरीसुद्धा वीज न जोडता महावितरण कंपनीने कृषिपंपाचे लाइट बिल शेतकऱ्याच्या माथी मारल्याचे समोर आले आहे.

नांदूरघाटमधील सर्व्हे नंबर ४४ या ठिकाणी २०१० ला दत्ता वैजनाथ जाधव या युवक शेतकऱ्याने एक एकर शेती विकत घेतली. एक एकर बागायती करण्यासाठी २०१४-१५ ला कोटेशन ७००० रुपये भरले. त्या शेतात वीज जोडण्यासाठी सात पोल व वीज तार आवश्यक होती. शासनाच्या नियमाप्रमाणे कोटेशन पूर्ण भरले. वारंवार पाठपुरावा करूनदेखील वीज कंपनीने वीज जोडणी केलीच नाही किंवा साधे पोलसुद्धा मोकळे उभे केले नाहीत. शेवटी हताश होऊन वैतागून शेतकरी दत्ता यांनी २०१६ ला जमीन होती तेवढी विकली व दत्ता भूमिहीन झाले. हॉटेलचा छोटा व्यवसाय करून उपजीविका भागू लागले. एवढे होऊन २०१७ मध्ये वीज वितरण कंपनीने दत्ता यांना ५६८५० रुपये दिले. यावर वरिष्ठांना बोलून व पूर्ण कैफियत वर्तमानपत्रात १४ नोव्हेंबर १७ रोजी मांडून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. यावर वरिष्ठांनी चुकून झाले, दुरुस्त होऊन जाईल असे सांगितले. एवढे होऊन डिसेंबर २०२० मध्ये आणखी वीज वितरण कंपनीचे लोक दत्ता जाधव यांच्याकडे आले व तुमच्या शेताचा सर्व्हे करायचा आहे, बिल खूप थकले आहे. गुन्हा दाखल होईल पैसे भरा असे सांगितले. तुम्हाला १२५४१० रुपये वीज बिल आले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भरून घ्या, असे सांगितले. हे सर्व पाहून व बोलणे ऐकून दत्ता यांची मनस्थिती खराब झाली. ज्या जमिनीसाठी कोटेशन भरले ते कोटेशन परत दिलेच नाही, तेथे लाइट नाही व जोडणी नाही. चार वर्षे झाले. वैतागून जमीन विकली, तरीपण वीज बिल आलेच कसे, या प्रश्नाने दत्ता यांचे मानसिक संतुलन अस्थिर झाले. याला जबाबदार असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव कुटुंबियांनी केली आहे.

मला वीज कधी दिली नाही, माझे भरलेले कोटेशन परत दिले नाही. वैतागून जमीन चार वर्षांपूर्वी विकली. आता तर सव्वालाख बिल माझ्या नावे आले आहे, मला न्याय हवा.

-दत्ता वैजनाथ जाधव, नांदूरघाट

त्या शेतकऱ्याला नांदूरघाट येथील ऑफिसला अर्ज द्यायला सांगा. वीज जोडली नाही; परंतु बिल आले म्हणून अर्ज द्या. आम्ही कार्यवाही करतो. बिल बंद करून टाकू व आलेली रक्कम माफ करून टाकू. या सर्व प्रकरणाची मी स्वतः चौकशी करून त्या शेतकऱ्याला न्याय देईन.

-आंबेकर (अभियंता, केज)