शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

जमीन, जोडणी नाही, तरीदेखील कृषिपंपाचे सव्वालाख वीज बिल भूमिहीन शेतकऱ्याच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST

नांदूरघाट : महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे वीज कोटेशन भरले. ...

नांदूरघाट : महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ समोर येऊ लागला आहे. ज्या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीकडे वीज कोटेशन भरले. वीज जोडणी मिळेना म्हणून परेशान होऊन जमीन विक्री केली व भूमिहीन झाला. तरीसुद्धा वीज न जोडता महावितरण कंपनीने कृषिपंपाचे लाइट बिल शेतकऱ्याच्या माथी मारल्याचे समोर आले आहे.

नांदूरघाटमधील सर्व्हे नंबर ४४ या ठिकाणी २०१० ला दत्ता वैजनाथ जाधव या युवक शेतकऱ्याने एक एकर शेती विकत घेतली. एक एकर बागायती करण्यासाठी २०१४-१५ ला कोटेशन ७००० रुपये भरले. त्या शेतात वीज जोडण्यासाठी सात पोल व वीज तार आवश्यक होती. शासनाच्या नियमाप्रमाणे कोटेशन पूर्ण भरले. वारंवार पाठपुरावा करूनदेखील वीज कंपनीने वीज जोडणी केलीच नाही किंवा साधे पोलसुद्धा मोकळे उभे केले नाहीत. शेवटी हताश होऊन वैतागून शेतकरी दत्ता यांनी २०१६ ला जमीन होती तेवढी विकली व दत्ता भूमिहीन झाले. हॉटेलचा छोटा व्यवसाय करून उपजीविका भागू लागले. एवढे होऊन २०१७ मध्ये वीज वितरण कंपनीने दत्ता यांना ५६८५० रुपये दिले. यावर वरिष्ठांना बोलून व पूर्ण कैफियत वर्तमानपत्रात १४ नोव्हेंबर १७ रोजी मांडून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. यावर वरिष्ठांनी चुकून झाले, दुरुस्त होऊन जाईल असे सांगितले. एवढे होऊन डिसेंबर २०२० मध्ये आणखी वीज वितरण कंपनीचे लोक दत्ता जाधव यांच्याकडे आले व तुमच्या शेताचा सर्व्हे करायचा आहे, बिल खूप थकले आहे. गुन्हा दाखल होईल पैसे भरा असे सांगितले. तुम्हाला १२५४१० रुपये वीज बिल आले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भरून घ्या, असे सांगितले. हे सर्व पाहून व बोलणे ऐकून दत्ता यांची मनस्थिती खराब झाली. ज्या जमिनीसाठी कोटेशन भरले ते कोटेशन परत दिलेच नाही, तेथे लाइट नाही व जोडणी नाही. चार वर्षे झाले. वैतागून जमीन विकली, तरीपण वीज बिल आलेच कसे, या प्रश्नाने दत्ता यांचे मानसिक संतुलन अस्थिर झाले. याला जबाबदार असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव कुटुंबियांनी केली आहे.

मला वीज कधी दिली नाही, माझे भरलेले कोटेशन परत दिले नाही. वैतागून जमीन चार वर्षांपूर्वी विकली. आता तर सव्वालाख बिल माझ्या नावे आले आहे, मला न्याय हवा.

-दत्ता वैजनाथ जाधव, नांदूरघाट

त्या शेतकऱ्याला नांदूरघाट येथील ऑफिसला अर्ज द्यायला सांगा. वीज जोडली नाही; परंतु बिल आले म्हणून अर्ज द्या. आम्ही कार्यवाही करतो. बिल बंद करून टाकू व आलेली रक्कम माफ करून टाकू. या सर्व प्रकरणाची मी स्वतः चौकशी करून त्या शेतकऱ्याला न्याय देईन.

-आंबेकर (अभियंता, केज)