शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अंबाजोगाईत क्रांतिदिनी शेतकरी कामगार पक्षाचा बैलगाडी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 19:57 IST

बैलगाडी मोर्चा अंबाजोगाई शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातुन निघाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सावरकर चौक,शिवाजी चौक मार्गे मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची, कामगारांची होत असणारी  पिळवणूक, अडवणूक थांबली पाहिजे. वयोवृध्द शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन लागू करा.

अंबाजोगाई : शेतकरी व कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली हा  बैलगाडी मोर्चा अंबाजोगाई शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातुन निघाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सावरकर चौक,शिवाजी चौक मार्गे मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शहरातून निघालेल्या या मोर्चामुळे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. या मोर्चात भाई मोहन गुंड, अॅड नारायण गोले पाटील, अॅड संग्राम तुपे ,भिमराव कुटे, भाई वजीर शेख, नवनाथ जाधव, बाळु तरकसे,अशोक रोडे ,अमोल सांवत यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या :  शेतकऱ्यांची, कामगारांची होत असणारी  पिळवणूक, अडवणूक थांबली पाहिजे. मागील वर्षाचा पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करा. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले  तिनही कृर्षी कायदे तात्काळ रद्द करा. बँकेकडून शेतकऱ्याची पीक कर्जासाठी अडवणूक तात्काळ थांबवा. डिझेल पेट्रोल गॅस महागाई तात्काळ कमी करा.  आंबासाखर सहकारी कारखान्यांच्या २०२०-२०२१ हंगाम ऊस गाळापाची उर्वरीत रक्कम एक रकमी द्यावी. हमाली करणाऱ्या असंघटित कामगारांचा माथाडी कामगारांच्या योजनेचा लाभ द्या. अतिवृष्टी झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्याना नुकसान भरपाई द्या. आंबेजोगाई तालुक्यातील संजय गांधी निराधारांचे  मानधन प्रत्येक महिन्याला वाटप करा.वयोवृध्द शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन लागू करा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून थकित नसलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये द्या. आंबेजोगाई शहरातील पाले- भाजी विक्रेते शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन कोरोनाच्या काळात त्यांच्याकडुन कुठल्याही शुल्काची नगरपालिकेने  आकारणी करू नये. आदी मागण्या मांडण्यात आल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड