शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

किट्टी आडगाव ग्रामीण बँकेवर ‘फिटलं आणि मिटलं’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:17 IST

शेतक-यांचे जुने कर्ज माफ करा आणि शेतक-यांना नवीन कर्ज त्वरित द्या, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर १ जानेवारील रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसहा तास आंदोलन : सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्ककिट्टी आडगाव : शेतक-यांचे जुने कर्ज माफ करा आणि शेतक-यांना नवीन कर्ज त्वरित द्या, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर १ जानेवारील रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.या मोर्चा प्रंसगी भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकºयांचे मनोगत ‘फिटलं आणि मिटलं’ या मागणीचे निवेदन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा किट्टी आडगाव यांना दिले. चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी शासनाकडून आणि बँकेच्या आरेरावीपणामुळे वेठीस धरला जात आहे.शासनाच्या आरेरावीपणामुळे झालेले उत्पन्न घरातही ठेवता येत नाही आणि बाजारातही विकले जात नाही. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? अस प्रश्न निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या सर्व मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकºयांच्या पाठीशी उभे राहून शेतकºयांचे पहिले कर्ज माफ करावे आणि त्वरित नवीन कर्ज देण्यात यावे या करीता ‘फिटलं आणि मिटलं’ या मागणीचे निवेदन मोर्चा काढून बँकेला देण्यात आले. या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह शेतकरी सहभागी झाले होते.शेतकºयांनी आमचे पहिले कर्ज माफ करा आणि दुसरे कर्ज त्वरित द्या, दुष्काळी अनुदान माणसी पाच हजार रूपये देण्यात यावे, जनावरांना चारा दावणीला देण्यात यावा. या घोषणांसह सरकारच्या नावाने घोषणा देत आंदोलन करण्यात आले. गुराढोरांसह अन्नत्याग, सत्याग्रह सकाळी १० वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत सुरू होते. या मोर्चामध्ये सहभागी सर्कलमधील नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी माजलगाव ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक सोमनाथ नरके, फौजदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन