शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कड्याचा गावरान कांदा इंडोनेशियात; आवक वाढल्याने शेकडो मजुरांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:15 IST

गावरान कांदा उत्पादकांना बाजारात अच्छे दिन आले असून, शेतकर्‍यांना एक हजारापासून अडीच हजारापर्यत प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत असल्याने  कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर  गाड्यांची विक्रमी आवक होत आहे.

कडा ( बीड ): गावरान कांदा उत्पादकांना बाजारात अच्छे दिन आले असून, शेतकर्‍यांना एक हजारापासून अडीच हजारापर्यत प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत असल्याने  कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर  गाड्यांची विक्रमी आवक होत आहे. आष्टीचा कांदा प्रथमच सातासमुद्रापार असलेल्या इंडोनेशियाच्या  बाजारात गेला आहे. कांदा आवक वाढल्यामुळे शेकडो मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

आष्टी तालुक्यात पाच-सहा वर्षांपूर्वी पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील पुरता हतबल झाला होता. मागील वर्षी सर्वत्र दमदार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची लागवड केली. यावर्षी पहिल्यांदाच बाजारात गावरान कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.

सध्या गावरान कांदा उत्पादकांना कडयाच्या बाजारात प्रतिक्विंटल एक हजार रुपयांपासून अडीच हजारापर्यंत भाव मिळत असल्याने या आठवड्यात येथील बाजारपेठेत आष्टीसह जालना, दौंड, भूम, परंडा, करमाळा, गेवराई, शेवगाव, पाथर्डी, बेलवंडी, इत्यादी ठिकाणावरून कांद्याच्या गाड्या दाखल होत  आहेत. शेकडो टन कांदा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहे. कांदा ठेवायला देखील जागा कमी पडत होती. 

कांद्याची विक्रमी आवक झाल्याने परिसरातील दीडशे ते दोनशे महिला-पुरुष मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कडयाचा हाच कांदा परदेशात मागणी असल्यामुळे उत्तरप्रदेशसह आॅस्ट्रेलिया, दुबई, लंडन, सिंगापूर,  इंडोनेशिया,श्रीलंका सारख्या देशाच्या बाजारात पाठवला  असल्याचे कांदा व्यापारी बबलू तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना  सांगितले.

बाजार समितीचाही लौकिककडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कांदा हा उत्तम आणि चांगला गोलाकार मनमोहक असल्याने परदेशात याला मागणी आहे.येथे आवक होेणार्‍या कांद्याला वीस ते पंचवीस रु पये प्रतिकिला भाव तसेच आवकनुसार दरात बदल होतो.ग्रामीण भागातील ही मोठी बाजार समिती असल्याने परदेशात कांद्याची निर्यात होत असल्याने शेतकरी वर्गाला भावही चांगला मिळतो. त्यामुळे बाजार समितीचा लौकिक होत असल्याचे सचिव हनुमंत गळगटे यांनी सांगितले.

मजुरांच्या हाताला कामबाजारात आष्टीसह विविध भागांतून गावरान कांद्याची प्रचंड आवक वाढल्यामुळे चांगल्या व दर्जेदार कांद्याची निवड करून ते गोणीत भरण्यासाठी शंभराहून अधिक मजुरांना दोनशे ते अडीचशे रुपये रोजगार मिळत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.- भिमाबाई सुभाष सोनवणे, मजूर मुकादम

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडonionकांदा