शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श भारत निर्मितीसाठी कबीरवाणी महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

बीड : भारताला जर खरच एक आदर्श देश निर्माण करायचा असेल तर कबीरवाणीतील विचार खूपच महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन ...

बीड : भारताला जर खरच एक आदर्श देश निर्माण करायचा असेल तर कबीरवाणीतील विचार खूपच महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन व्याख्यात्या अर्चना सानप यांनी केले. येथील विचारवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात संत कबीर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून औषधनिर्माण अधिकारी प्रियंका जाधव उपस्थित होत्या.

अर्चना सानप म्हणाल्या, संत कबीर यांनी संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी प्रयत्न केले. कबीरवाणीमध्ये बरेचसे प्रसंग आजच्या काळातही अनुकूल आहेत. संत कबीर एक महान क्रांती असलेले विचारवंत म्हणून नेहमी लक्षात राहतात. सध्या जगात फक्त भारतातच नाही तर विविध देशांमध्ये त्यांच्या रचनांवर वेगवेगळ्या प्रकारे शोध सुरू आहेत. आज समाजात जी अशांतता, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी संत कबीर यांचे आदर्श एक अनमोल ठेवा आहे. त्यादृष्टीने कबीर यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रत्येक सामान्य व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. संत कबीर यांचा जन्म अशा काळात झाला की, त्यावेळी सर्व जग हे अशांतीने ग्रासले होते. त्यांनी आपल्या विचारांनी पूर्ण जगात शांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संत कबीर यांचा प्रामुख्याने सामाजिक न्यायावर आधारित समाजाच्या निर्मितीवर भर दिला व लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला. याची आजच्या काळातही आवश्यकता आहे, असे मत सानप यांनी व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पंडित यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी प्रल्हाद वाघमारे, पांडुरंग पंडित, दिलीप वाघमारे, किशोर पंडित, कुणाल जाधव, अमोल पंडित, आदी उपस्थित होते.