शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

जायभायवाडी, कोळपिंप्री बनले जलक्रांतीसाठी प्रेरणादायी‘मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:37 IST

वॉटर कप स्पर्धेत राज्यभर गाजलेले जायभायवाडी व तालुक्यात प्रथम आलेले कोळपिंप्री यावर्षी सहभागी वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे.

- अनिल महाजन 

धारुर ( बीड ): तालूक्यात वॉटर कप स्पर्धेत राज्यभर गाजलेले जायभायवाडी व तालुक्यात प्रथम आलेले कोळपिंप्री यावर्षी सहभागी वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. या दोन पाणीदार झालेल्या गावातील कामे पाहण्यासाठी रोज जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील नागरिकांच्या सहली येत आहेत. या गावातील काम पाहून थक्क होत आपल्या गावात परिवतर्नाची संधी समजून गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचा संकल्प करीत आहेत.

धारूर तालुक्याचा समावेश गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत झाला. तालुक्यातील ४० पेक्षा जास्त गावे स्पर्धेत उतरली व सात ते आठ गावात चांगले काम झाले. जायभायवाडी हे डोंगराच्या कुशीत असलेले गाव. या गावाची ऊसतोड कामगाराचं व दुष्काळी गाव म्हणून ओळख. पाऊस पडल्यावर एक पीक घ्यायचे व पुन्हा सहा महिने घर, गाव सोडून ऊस तोडायला जायचे. अनेक वर्षापासूनची ही दिनचर्या. विकासापासून कोसो दूर अशी अवस्था असणारे दुर्लक्षित गाव .गतवर्षी पाणी फांऊडेशनची वॉटर कप स्पर्धा या भागासाठी आली. ही स्पर्धा परिवर्तनासाठी मोठी संधी ठरली. गावात जलक्रांतीची चळवळ निर्माण झाली. गावकर्‍यांनी एकजुटीने श्रमदान केले तर ज्ञानप्रबोधनी, भारतीय जैन, मानवलोक, तालुका पत्रकार संघ यांनी शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी या गावातील चळवळीला मोठी मदत केली. या गावात थेंबन् थेंब पाणी जमिनीत कसे मुरेल यावर काम झाले.

या गावाला पाणीदार करण्यासाठी पाणी फांऊडेशनचे अविनाश पौळ, शेख इरफान, संतोष शिनगारे, बापू लुंगेकर, नितीन पाटूळे यांचे सातत्याने मिळालेले मार्गदर्शन यामुळे तसेच मानवलोकचे अनिकेत लोहीया, ज्ञानप्रबोधनीचे प्रसाद दादा चिक्षे, अभिजीत जोंधळे  यांचे मिळालेले विशेष सहकार्य, चित्रपट निर्माते संतोष जेव्हीकर, ज्ञानप्रबोध डोंबिवली यांचे मिळालेले आर्थिक सहकार्य यामुळे चळवळीला हजारो हातांची मिळालेली साथ यातून गावाला परिवतर्नाची दिशा मिळाली. या गावाने स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवत इतिहास रचला. गाव पाणीदार होऊन हा डोंगरपट्टा हिरवागार झाला. या भागाला परिवर्तनाची वाट दाखवण्याचे काम या गावाने केले. 

यावर्षी या गावातील काम पाहण्यासाठी विविध गावांचे नागरिक येत आहेत. डॉ. सुंदर जायभाये यांनी या परिवर्तनाचा इतिहास घडवण्यासाठी व गावाला एकजूट करण्यासाठी घेतलेले परिश्रम हे शब्दात वर्णन करता येणार नाही असे आहेत.  माथा ते पायथा केलेले पाणी उपचार पाहण्यासारखे आहेत. डिप सी. सी. टी, सी. सी. टी मातीनाला बांध इ. कामे पाहण्यासारखी आहेत. डोंगरीभागात कसे काम करावे यांचे आदर्श मॉडेल जायभायवाडी आहे, तर सपाटीकरणाच्या गावात कसे काम केले पाहिजे, याचे आदर्श मॉडेल कोळपिंप्री हे गाव आहे. नाला खोलीकरण, बांध बंदिस्ती आदी कामे पाहण्यासारखी आहेत. या गावाने गतवर्षी केलेल्या कामामुळे हे गाव जानेवारी महिन्यात टँकर लावावे लागणारे गाव यावर्षी पाणीदार होऊन टँकरमुक्त झाले आहे. 

गाव पाणीदार  करण्याची मिळते प्रेरणा

यावर्षी वॉटर कपमध्ये सहभागी होणारे जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील नागरिक या दोन्ही गावातील काम पाहण्यासाठी भेटी देऊन झालेल्या कामाची करीत आहेत. आपल्या गावात यापेक्षा जोरदार काम करण्याची प्रेरणा घेऊन जात आहेत. धारुर तालुक्यातील ५८ गावांनी या वर्षी सहभाग घेतला असून दुष्काळमुक्तीची व तालूका पाणीदार करण्याची चळवळ जोर धरत आहे. 

टॅग्स :WaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाBeedबीड