शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जायभायवाडी, कोळपिंप्री बनले जलक्रांतीसाठी प्रेरणादायी‘मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:37 IST

वॉटर कप स्पर्धेत राज्यभर गाजलेले जायभायवाडी व तालुक्यात प्रथम आलेले कोळपिंप्री यावर्षी सहभागी वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे.

- अनिल महाजन 

धारुर ( बीड ): तालूक्यात वॉटर कप स्पर्धेत राज्यभर गाजलेले जायभायवाडी व तालुक्यात प्रथम आलेले कोळपिंप्री यावर्षी सहभागी वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. या दोन पाणीदार झालेल्या गावातील कामे पाहण्यासाठी रोज जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील नागरिकांच्या सहली येत आहेत. या गावातील काम पाहून थक्क होत आपल्या गावात परिवतर्नाची संधी समजून गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचा संकल्प करीत आहेत.

धारूर तालुक्याचा समावेश गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत झाला. तालुक्यातील ४० पेक्षा जास्त गावे स्पर्धेत उतरली व सात ते आठ गावात चांगले काम झाले. जायभायवाडी हे डोंगराच्या कुशीत असलेले गाव. या गावाची ऊसतोड कामगाराचं व दुष्काळी गाव म्हणून ओळख. पाऊस पडल्यावर एक पीक घ्यायचे व पुन्हा सहा महिने घर, गाव सोडून ऊस तोडायला जायचे. अनेक वर्षापासूनची ही दिनचर्या. विकासापासून कोसो दूर अशी अवस्था असणारे दुर्लक्षित गाव .गतवर्षी पाणी फांऊडेशनची वॉटर कप स्पर्धा या भागासाठी आली. ही स्पर्धा परिवर्तनासाठी मोठी संधी ठरली. गावात जलक्रांतीची चळवळ निर्माण झाली. गावकर्‍यांनी एकजुटीने श्रमदान केले तर ज्ञानप्रबोधनी, भारतीय जैन, मानवलोक, तालुका पत्रकार संघ यांनी शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी या गावातील चळवळीला मोठी मदत केली. या गावात थेंबन् थेंब पाणी जमिनीत कसे मुरेल यावर काम झाले.

या गावाला पाणीदार करण्यासाठी पाणी फांऊडेशनचे अविनाश पौळ, शेख इरफान, संतोष शिनगारे, बापू लुंगेकर, नितीन पाटूळे यांचे सातत्याने मिळालेले मार्गदर्शन यामुळे तसेच मानवलोकचे अनिकेत लोहीया, ज्ञानप्रबोधनीचे प्रसाद दादा चिक्षे, अभिजीत जोंधळे  यांचे मिळालेले विशेष सहकार्य, चित्रपट निर्माते संतोष जेव्हीकर, ज्ञानप्रबोध डोंबिवली यांचे मिळालेले आर्थिक सहकार्य यामुळे चळवळीला हजारो हातांची मिळालेली साथ यातून गावाला परिवतर्नाची दिशा मिळाली. या गावाने स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवत इतिहास रचला. गाव पाणीदार होऊन हा डोंगरपट्टा हिरवागार झाला. या भागाला परिवर्तनाची वाट दाखवण्याचे काम या गावाने केले. 

यावर्षी या गावातील काम पाहण्यासाठी विविध गावांचे नागरिक येत आहेत. डॉ. सुंदर जायभाये यांनी या परिवर्तनाचा इतिहास घडवण्यासाठी व गावाला एकजूट करण्यासाठी घेतलेले परिश्रम हे शब्दात वर्णन करता येणार नाही असे आहेत.  माथा ते पायथा केलेले पाणी उपचार पाहण्यासारखे आहेत. डिप सी. सी. टी, सी. सी. टी मातीनाला बांध इ. कामे पाहण्यासारखी आहेत. डोंगरीभागात कसे काम करावे यांचे आदर्श मॉडेल जायभायवाडी आहे, तर सपाटीकरणाच्या गावात कसे काम केले पाहिजे, याचे आदर्श मॉडेल कोळपिंप्री हे गाव आहे. नाला खोलीकरण, बांध बंदिस्ती आदी कामे पाहण्यासारखी आहेत. या गावाने गतवर्षी केलेल्या कामामुळे हे गाव जानेवारी महिन्यात टँकर लावावे लागणारे गाव यावर्षी पाणीदार होऊन टँकरमुक्त झाले आहे. 

गाव पाणीदार  करण्याची मिळते प्रेरणा

यावर्षी वॉटर कपमध्ये सहभागी होणारे जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील नागरिक या दोन्ही गावातील काम पाहण्यासाठी भेटी देऊन झालेल्या कामाची करीत आहेत. आपल्या गावात यापेक्षा जोरदार काम करण्याची प्रेरणा घेऊन जात आहेत. धारुर तालुक्यातील ५८ गावांनी या वर्षी सहभाग घेतला असून दुष्काळमुक्तीची व तालूका पाणीदार करण्याची चळवळ जोर धरत आहे. 

टॅग्स :WaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाBeedबीड