शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 19:25 IST

चौथ्या दिवशी आले पाणी

ठळक मुद्देचार दिवसापूर्वी नाथ सागर धरण हे ८० टक्के भरल्याने सोडले पाणी

माजलगाव (बीड ) : पैठण येथील नाथसागर धरणाची पाणी पातळी चार दिवसांपूर्वी ८० टक्क्यांचवर गेल्याने धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. हे पाणी मंगळवारी सायंकाळी ५  वाजता माजलगाव धरणात आल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

नाथसागर धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने थैमान घातले होते त्यामुळे नाथसागर धरण हे केवळ चार दिवसात भरत आले. तर दुसरीकडे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नाथसागरातुन माजलगाव धरणात उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली.

चार दिवसापूर्वी नाथ सागर धरण हे ८० टक्के भरल्याने येथुन माजलगाव धरणात कालव्याद्वारे ९00 क्युसेकने ९ ऑगस्टपासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव धरणात पोहोचले. यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच या पाण्यामुळे बीड व माजलगाव शहरासह अनेक गावचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणीBeedबीड