शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जय महेश कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:05 IST

शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला दिलेल्या उसापोटी किफायतशीर दराने द्यावयाची रक्कम उशिराने दिल्या प्रकरणात माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देखंडपीठ : जीवनावश्यक वस्तू कायदा कलमानुसार कारवाई करा

बीड : शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला दिलेल्या उसापोटी किफायतशीर दराने द्यावयाची रक्कम उशिराने दिल्या प्रकरणात माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिला आहे.यासंदर्भात बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील तालखेड येथील शेतकरी पवन रामकिसन चांडक यांनी याचिका दाखल केली होती की, जय महेश शुगर लिमिटेड, पवारवाडी यांनी फेब्रुवारी आणि मार्च २०१९ मध्ये त्यांचा ऊस गाळपासाठी नेला. ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार साखर कारखान्याने शेतकºयाचा ऊस गाळपासाठी नेल्यानंतर १४ दिवसांत त्याचा मोबदला दिला पाहिजे. १४ दिवसांत मोबदला देऊ न शकल्यास किंवा मोबदला देण्यास विलंब झाल्यास, शेतकºयाला देय मोबदल्यावर दरसाल दर शेकडा १५ टक्के दराने व्याज मिळायला हवे.जय महेश कारखान्याने याचिकाकर्ता आणि इतर शेतकऱ्यांना उसाचा मोबदला मुदतीत दिला नाही. कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून शेतकºयांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. सुनावणीअंती खंडपीठाने माजलगाव (ग्रामीण) पोलिसांना वरीलप्रमाणे आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुदर्शन साळुंके यांनी, तर शासनातर्फे एस. बी. नरवडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ