शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

‘काही जण भाजपत गेल्याने फरक पडत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:23 IST

काही मूठभर पदाधिकारी भाजपमध्ये गेले याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नसतो सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.

ठळक मुद्देप्रकाश सोळंके : मोहखेडपेक्षा छत्रबोरगावातून मताधिक्याची आशा

माजलगाव : काही मूठभर पदाधिकारी भाजपमध्ये गेले याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नसतो सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथे प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, रमेश सोळंके, विश्वंभर थावरे, छगन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांना अभिवादन करत प्रकाश सोळंके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.प्रकाश सोळंके म्हणाले, आपल्या ३२ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत छत्रबोरगावला किमान शंभर वेळा तरी भेट दिलेली आहे. मात्र या निवडणुकीत छत्रबोरगावकरांनी केलेले अभूतपूर्व स्वागत मी कदापिही विसरू शकणार नाही माझ्यावर जे अफाट प्रेम ग्रामस्थांनी दाखवले. त्या ॠणात कायम राहणे पसंत करेल. माझे मूळ गाव मोहखेड पेक्षाही छत्रबोरगावमधून मताधिक्य मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत सोळंके म्हणाले, माझ्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ग्रामीण भागाचा फार मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील सामान्य माणूसच माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे छत्रबोरगाव परिसरावर माझे विशेष प्रेम आहे. ग्रामस्थांनीही मला भरभरून दिलेले आहे. ग्रामस्थांच्या ॠणात सदैव राहण्याची आपली तयारी असून आमदार झाल्यानंतर छत्रबोरगावकरांच्या हाकेला ओ देऊन त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांवNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrakash Solankeप्रकाश सोळंके