शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

बीड जिल्ह्यात कडबा भडकला, शेतकरी ऊस विकू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:36 PM

जिल्हयात पावसाने मोठी ओढ दिल्याने संभाव्य दुष्काळजन्य स्थितीमुळे पशुधनाच्या कडब्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत.

बीड : जिल्हयात पावसाने मोठी ओढ दिल्याने संभाव्य दुष्काळजन्य स्थितीमुळे पशुधनाच्या कडब्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत. जूनमध्ये १७०० रुपये शेकडा मिळणारा कडबा सध्या २५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कडबा टंचाईमुळे पशुपालक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतातील ऊस  जळून जाण्याआधीच उपटलेला ऊस शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. 

बीड जिल्ह्यात यावर्षी पावसाची अवकृपा राहिली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४८ टक्के तोही अनियमित व विषम प्रमाणात झाला आहे. पीक परिस्थिती बिकट असतानाच पशुधन सांभाळणाऱ्या पालकांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. मागील वर्षी पाऊसप्रमाण चांगले राहिल्याने जलसाठ्यात वाढ झाली. समाधानकारक पातळीमुळे पाण्याची टंचाई भासली नाही. परंतू यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तर चाऱ्याची मुबलक उपलब्धता होती. त्यामुळे मे- जूनमध्ये कडब्याचे भाव शेकडा १७०० ते २००० रुपये इतके होते. बीडमध्ये नगर, उस्मानाबाद जिल्ह्यातून कडब्याची आवक बऱ्यापैकी होती. नंतर मात्र पाऊस नसल्याने व दुष्काळी चाहूल लागल्याने कडब्याचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. 

दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याने संभाव्य परिस्थिती लक्षात घेत कडब्याच्या दरात तेजीचे वारे सुरू आहेत. सध्या येथील बाजारात कडब्याचे भाव शेकडा २५०० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.  कडब्याचे दर १७०० वरून २५०० पर्यंत पोहोचले आहेत, तर वाढ्यासह उसाचे भाव १७०० ते १८०० रुपये आहेत. त्यामुळे कडब्याच्या जागी उसालाही पशुपालक पसंती देत आहेत. पशुधन जगविण्यासाठी पशुपालकांची कसरत सुरु आहे.

बीड येथील मंडईत कोल्हारवाडी, इमामपूर, वायभटवाडी, बीड, काठोडा, पिंपळनेर तसेच तालुक्यातील इतर गावातून शेतकरी कडबा खरेदीसाठी येतात. कडब्याचे भाव लक्षात घेत पशुपालकांनीही आखडते घेतले आहे. लागेल त्यापेक्षा कमी प्रमाणात कडबा खरेदी करतात, असे मधुकर चांदणे म्हणाले. सध्या उत्पादक व मोठ्या व्यापाऱ्यांकडून कडबा पुरवठा कमी होत आहे. पावसावरच भिस्त आहे. पाऊस चांगला झाल्यास कडब्याचे भाव शेकडा १५०० ते २००० रुपये होऊ शकतात, असे सय्यद बाबूभाई यांनी सांगितले. पाऊस परिस्थतीचा अंदाज घेत काही उत्पादक शेतकरी त्यांच्याकडील कडब्याचा स्टॉक तसेच ठेवणे पसंत केले आहे. आणखी तेजीची त्यांना शक्यता आहे. 

एकीकडे कडब्याचे भाव वाढत असताना दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी पावसाअभावी ऊस वाळून जात असल्याने तसेच हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान होण्यापेक्षा येथील कडबा मंडईत वाढ्यासह ऊस विक्रीस आणत आहेत. तालुक्यातील १५ ते २० शेतकरी आर्थिक गरजेनुसार त्यांचा ऊस स्वत: विकत आहेत. 

व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ; कामगारांचा रोजगार घटलाबीड येथील कडबा मंडईत लहान- मोठे २० पेक्षा जास्त व्यापारी आहेत. तर २५-३० कामगार हमाली व इतर कामातून गुजराण करतात. सध्या कडबा मिळत नसल्याने व उपलब्ध कडबा महाग असल्याने तसेच भांडवली गुंतवणूक वाढल्याने या व्यवसायातील काही जण इतर व्यवसायांकडे वळले आहेत. तर आवक घटल्याने कामगारांचा रोजगार घटल्याचे शेख मजहर म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र