शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

इंदिराजींनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 23:28 IST

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या ध्येयधोरणावर टीका केली.

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड : संविधान बचाव सभेत भाजप सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीवर टीका; संघटित लढा देण्याचे वक्त्यांचे आवाहन

बीड : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या ध्येयधोरणावर टीका केली.बीड येथे बुधवारी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या महासभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मौलाना अबु तालीब रहमानी, माजी. न्या. बी. जी कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, दीपसिता धार, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, उषा दराडे, सिराज देशमुख, प्रा. सुनील धांडे आदी उपस्थित होते.आव्हाड म्हणाले, एखादा हिटलर जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो सर्वात जास्त बुद्धिवाद्यांना आणि विद्यार्थ्यांना घाबरतो, कारण बंडखोरी त्यांच्या अंगात असते म्हणूनच जेएनयुसह इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू आहेत. आज विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल, परंतु हीच संख्या मोठी असल्याचे सांगत त्यांनी इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीचा संदर्भ दिला.यावेळी आव्हाड यांनी ‘ना हिंदू , ना मुसलमान संविधान खतरे में है’ म्हणत मोदी- शहांवर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडले, आम्हाला पुरावे मागणारे त्यावेळी कोठे होते, असा सवाल आव्हाड यांनी केला. भाजपला जे काय करायचं, ते करु द्या. एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान आणि मुखात जयभीमचा नारा देऊन देश विभक्त करण्याचे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या दीपसिता धार, तिस्ता सेटलवाड यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या धोरणावर टीका केली.देश अहंकाराने नव्हे, संविधानावर चालेलमोदी- शहांवर टीका करताना मौलाना तालीब रहमानी म्हणाले, एकही इंच हटणार नाही म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी करु. तुम्ही चेहरे पाहतात, आम्ही तिरंग्याकडे पाहतो. आमच्या एका हातात कुराण आणि दुसºया हातात संविधान असेल. हजारो प्रयत्न केले तरी हा देश अहंकाराने नव्हे तर संविधानानुसार चालेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.जनशक्तीच्या बळावर क्रांती करून्या.बी.जी. कोळसे पाटील यांनी मोदी, शहा यांच्यावर टीका केली. आरएसएस देशाची शत्रू असून मोदी, शहा दलाल असल्याचे ते म्हणाले. साडेपाच वर्षात रोजगार संपला, बॅँका बुडाल्या, सामान्यांसाठीचे कायदे बासनात गुंडाळले. न्याय व्यवस्था नोकरशाही धोक्यात आली. सीएए, एनसीआर कायद्याविरोधात संघटितपणे लढा देण्याचे आवाहन केले

टॅग्स :BeedबीडJitendra Awhadजितेंद्र आव्हाडIndira Gandhiइंदिरा गांधी