शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराजींनी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 23:28 IST

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या ध्येयधोरणावर टीका केली.

ठळक मुद्देजितेंद्र आव्हाड : संविधान बचाव सभेत भाजप सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीवर टीका; संघटित लढा देण्याचे वक्त्यांचे आवाहन

बीड : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे इंदिराजींचा पराभव झाला, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्या ध्येयधोरणावर टीका केली.बीड येथे बुधवारी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या महासभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मौलाना अबु तालीब रहमानी, माजी. न्या. बी. जी कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, दीपसिता धार, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, उषा दराडे, सिराज देशमुख, प्रा. सुनील धांडे आदी उपस्थित होते.आव्हाड म्हणाले, एखादा हिटलर जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो सर्वात जास्त बुद्धिवाद्यांना आणि विद्यार्थ्यांना घाबरतो, कारण बंडखोरी त्यांच्या अंगात असते म्हणूनच जेएनयुसह इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू आहेत. आज विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल, परंतु हीच संख्या मोठी असल्याचे सांगत त्यांनी इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीचा संदर्भ दिला.यावेळी आव्हाड यांनी ‘ना हिंदू , ना मुसलमान संविधान खतरे में है’ म्हणत मोदी- शहांवर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडले, आम्हाला पुरावे मागणारे त्यावेळी कोठे होते, असा सवाल आव्हाड यांनी केला. भाजपला जे काय करायचं, ते करु द्या. एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान आणि मुखात जयभीमचा नारा देऊन देश विभक्त करण्याचे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन आव्हाड यांनी केले.जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या दीपसिता धार, तिस्ता सेटलवाड यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या धोरणावर टीका केली.देश अहंकाराने नव्हे, संविधानावर चालेलमोदी- शहांवर टीका करताना मौलाना तालीब रहमानी म्हणाले, एकही इंच हटणार नाही म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी करु. तुम्ही चेहरे पाहतात, आम्ही तिरंग्याकडे पाहतो. आमच्या एका हातात कुराण आणि दुसºया हातात संविधान असेल. हजारो प्रयत्न केले तरी हा देश अहंकाराने नव्हे तर संविधानानुसार चालेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.जनशक्तीच्या बळावर क्रांती करून्या.बी.जी. कोळसे पाटील यांनी मोदी, शहा यांच्यावर टीका केली. आरएसएस देशाची शत्रू असून मोदी, शहा दलाल असल्याचे ते म्हणाले. साडेपाच वर्षात रोजगार संपला, बॅँका बुडाल्या, सामान्यांसाठीचे कायदे बासनात गुंडाळले. न्याय व्यवस्था नोकरशाही धोक्यात आली. सीएए, एनसीआर कायद्याविरोधात संघटितपणे लढा देण्याचे आवाहन केले

टॅग्स :BeedबीडJitendra Awhadजितेंद्र आव्हाडIndira Gandhiइंदिरा गांधी