शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:39 IST

धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले. 

बीड : शेतकऱ्यांना अनुदान नाही, पीकविमा नाही, मराठा, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळत नाही. कैकाडी, महादेव कोळी, गरिबांना काही दिले जात नाही, बंजारा समाजाला प्रवर्ग दिला जात नाही, आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी करा,  असे आव्हान  देत मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी ‘ए सरकार म्हणत दंड थोपटले. या राज्यासाठी झिजणाऱ्या समाजाचा  खुन्नस ठेवून, डोळ्यात चटणी टाकून अपमान केला तर उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत आपली भूमिका आचारसंहितेनंतर  स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले. 

समाजाच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाहीअन्यायाविरुद्ध उठाव करावा लागतो. अडवणूक आणि अन्याय होणार असेल तर उठाव करावाच लागणार, असे  सांगत जरांगे म्हणाले, समाजाचे दारिद्र्य कमी व्हावे म्हणून संघर्ष केला.  मी व माझ्या समाजाने असे कोणते पाप केले? शेतकरी, समाजाने काय केलं? हे कोणी सांगेल का? समाजाच्या डोळ्यातील पाणी बघवत नाही. 

कोणावर अन्याय करायचा नाही, पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करावेच लागेल. या राज्यात न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. १४ महिन्यांपासून गरिबांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून माझ्यासारखा गरीब झुंजतोय. तुमची लेकरं माेठी व्हावीत, यासाठी एकजुटीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तुमच्या डोक्यावर गुलाल टाका, दुसऱ्यावर गुलाल टाकायच्या नादात कलंक लागू देऊ नका, समाजाची शान, शक्ती आणि बळ वाढवा, असेही ते म्हणाले. 

आता धक्का लागत नाही का?- आम्ही आरक्षण मागत होतो, तेव्हा धक्का लागत असल्याचे सांगितले जात होते. तुमच्या मागण्या महाविकास आघाडीकडून लिहून घ्या म्हणायचे. आता आरक्षणात १७ जाती घातल्या आहेत. 

- मग या काय त्यांच्याकडून लिहून घेतल्या का? आता आरक्षणाला  धक्का लागत नाही का? गरीब, ओबीसींचा विचार का केला नाही? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. सरकारने हा निर्णय खुन्नस ठेवून केल्याचे सांगत अन्याय करणार असेल तर समोरच्यांना उखडून फेकावे लागेल, असे जरांगे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDasaraदसरा