शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:39 IST

धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले. 

बीड : शेतकऱ्यांना अनुदान नाही, पीकविमा नाही, मराठा, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळत नाही. कैकाडी, महादेव कोळी, गरिबांना काही दिले जात नाही, बंजारा समाजाला प्रवर्ग दिला जात नाही, आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी करा,  असे आव्हान  देत मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी ‘ए सरकार म्हणत दंड थोपटले. या राज्यासाठी झिजणाऱ्या समाजाचा  खुन्नस ठेवून, डोळ्यात चटणी टाकून अपमान केला तर उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत आपली भूमिका आचारसंहितेनंतर  स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले. 

समाजाच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाहीअन्यायाविरुद्ध उठाव करावा लागतो. अडवणूक आणि अन्याय होणार असेल तर उठाव करावाच लागणार, असे  सांगत जरांगे म्हणाले, समाजाचे दारिद्र्य कमी व्हावे म्हणून संघर्ष केला.  मी व माझ्या समाजाने असे कोणते पाप केले? शेतकरी, समाजाने काय केलं? हे कोणी सांगेल का? समाजाच्या डोळ्यातील पाणी बघवत नाही. 

कोणावर अन्याय करायचा नाही, पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करावेच लागेल. या राज्यात न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. १४ महिन्यांपासून गरिबांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून माझ्यासारखा गरीब झुंजतोय. तुमची लेकरं माेठी व्हावीत, यासाठी एकजुटीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तुमच्या डोक्यावर गुलाल टाका, दुसऱ्यावर गुलाल टाकायच्या नादात कलंक लागू देऊ नका, समाजाची शान, शक्ती आणि बळ वाढवा, असेही ते म्हणाले. 

आता धक्का लागत नाही का?- आम्ही आरक्षण मागत होतो, तेव्हा धक्का लागत असल्याचे सांगितले जात होते. तुमच्या मागण्या महाविकास आघाडीकडून लिहून घ्या म्हणायचे. आता आरक्षणात १७ जाती घातल्या आहेत. 

- मग या काय त्यांच्याकडून लिहून घेतल्या का? आता आरक्षणाला  धक्का लागत नाही का? गरीब, ओबीसींचा विचार का केला नाही? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. सरकारने हा निर्णय खुन्नस ठेवून केल्याचे सांगत अन्याय करणार असेल तर समोरच्यांना उखडून फेकावे लागेल, असे जरांगे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDasaraदसरा