शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:39 IST

धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले. 

बीड : शेतकऱ्यांना अनुदान नाही, पीकविमा नाही, मराठा, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळत नाही. कैकाडी, महादेव कोळी, गरिबांना काही दिले जात नाही, बंजारा समाजाला प्रवर्ग दिला जात नाही, आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी करा,  असे आव्हान  देत मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी ‘ए सरकार म्हणत दंड थोपटले. या राज्यासाठी झिजणाऱ्या समाजाचा  खुन्नस ठेवून, डोळ्यात चटणी टाकून अपमान केला तर उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत आपली भूमिका आचारसंहितेनंतर  स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले. 

समाजाच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाहीअन्यायाविरुद्ध उठाव करावा लागतो. अडवणूक आणि अन्याय होणार असेल तर उठाव करावाच लागणार, असे  सांगत जरांगे म्हणाले, समाजाचे दारिद्र्य कमी व्हावे म्हणून संघर्ष केला.  मी व माझ्या समाजाने असे कोणते पाप केले? शेतकरी, समाजाने काय केलं? हे कोणी सांगेल का? समाजाच्या डोळ्यातील पाणी बघवत नाही. 

कोणावर अन्याय करायचा नाही, पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करावेच लागेल. या राज्यात न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. १४ महिन्यांपासून गरिबांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून माझ्यासारखा गरीब झुंजतोय. तुमची लेकरं माेठी व्हावीत, यासाठी एकजुटीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तुमच्या डोक्यावर गुलाल टाका, दुसऱ्यावर गुलाल टाकायच्या नादात कलंक लागू देऊ नका, समाजाची शान, शक्ती आणि बळ वाढवा, असेही ते म्हणाले. 

आता धक्का लागत नाही का?- आम्ही आरक्षण मागत होतो, तेव्हा धक्का लागत असल्याचे सांगितले जात होते. तुमच्या मागण्या महाविकास आघाडीकडून लिहून घ्या म्हणायचे. आता आरक्षणात १७ जाती घातल्या आहेत. 

- मग या काय त्यांच्याकडून लिहून घेतल्या का? आता आरक्षणाला  धक्का लागत नाही का? गरीब, ओबीसींचा विचार का केला नाही? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. सरकारने हा निर्णय खुन्नस ठेवून केल्याचे सांगत अन्याय करणार असेल तर समोरच्यांना उखडून फेकावे लागेल, असे जरांगे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDasaraदसरा