शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:34 IST

पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही, त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली आहे.

अंबाजोगाई- बीड जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार. आम्ही काय नुसत्या भेटीचं देत फिरायच का? पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही, त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली आहे. ही गुंडगिरी निर्माण झालेले विदारक वातावरण दूर करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहोत, असे वक्तव्य मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे याला गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. शिवराज याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी(दि.18) दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी शिवराजची भेट घेतली आणि त्याची आस्थेवाईक पणे चौकशी केली. यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, शिवराजच्या अंगावरील मारहाणीचे वळ पाहून अंगावर काटा येतो. सामूहिक कट रचून त्याला जीवे मारण्यासाठीच त्याचे अपहरण केले, मात्र लोक धावून आल्याने त्याचा जीव वाचला. अशा घटना वारंवार घडूनही सरकार काहीच करत नाही. किती दिवस आम्ही तरी शांत रहायचे? ही वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. बीड जिल्यातील सर्व घराणे व सामाजिक क्षेत्रातील लोकांशी चर्चा करुन पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. गुंडांचा माज उतरवणार. यापुढे बोलणार कमी व काम जास्त करणार, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

चौकशीच्या फेऱ्यात येऊ नका...शिवराज याला मोठा मार लागला आहे, तो गंभीर जखमी आहे, तरीही डॉक्टर लोक सांगतात त्याला केवळ मुक्का मार आहे. आरोपीला वाचविण्यासाठी जर कोणावर दबाव येत असेल तर घाबरू नका? तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात अडकाल, असा इशाराही त्यांनी वैद्यकीय प्रशासनाला दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmbajogaiअंबाजोगाईCrime Newsगुन्हेगारी