शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवरा दारूडा, लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात मोडला संसार; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

By सोमनाथ खताळ | Updated: April 30, 2023 18:53 IST

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पतीसह सारच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सोमनाथ खताळ, बीड: पती दारूडा असल्याने लग्नानंतर अवघ्या सातच महिन्यात संसार मोडल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. पतीला व्यावसाय करण्यासाठी विवाहितेला माहेरहून ३ लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पतीसह सारच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड शहरातील तरूणीचा २२ मे २०२२ रोजी पाटोदा येथील तरूणासोबत विवाह झाला होता. यावेळी तरूणीच्या माहेरकडील लोकांनी लग्नात चार लाख रूपये खर्च करून नवरदेवाला पाच ग्रॅमची अंगठीही घातली. त्यानंतर सुरूवातीचे सहा महिने विवाहितेला सुखाने नांदवले. नंतर तिला पती दारूडा आणि त्याला कसलीही नौकरी नसल्याचे समजले. तो दारू पिऊन पत्नीला मारहाण करू लागला. हा प्रकार विवाहितेने सासरच्यांना सांगितला. परंतू त्यांनीही उलट विवाहितेलाच त्रास दिला. तुझ्या पतीला खासगी व्यावसाय करण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपये घेऊन ये असे म्हणत २४ डिसेंबर २०२२ रोजी विवाहितेला मारहाण करत घराबाहेर काढण्यात आली. त्यानंतर अनेकवेळा सासरच्यांची समजूत काढली परंतू त्यांनी विवाहितेला नांदविण्यास नकार दिला. अखेर तिने बीडचे शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून पतीसह सासू, सासरे, दीर, मेव्हणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड