शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शासनाकडून शेतकऱ्यांना किती मदत मिळाली ?- कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:30 IST

शासनाकडून शेतक-यांना किती मदत मिळाली हे सर्वांनाच माहिती आहे, असा प्रश्न पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीत शासनाकडून शेतक-यांना किती मदत मिळाली हे सर्वांनाच माहिती आहे, असा प्रश्न पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला. त्यामुळे शेतक-यांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम राबवला जाणार आहे. ९ जानेवारीपासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात बीडमधून होणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी कदम बीडमध्ये आले आहेत. यावेळी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी ही माहिती दिली.यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे, औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, कुंडलिक खांडे, बाबासाहेब पिंगळे, चंद्रकांत नवले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना कदम म्हणाले मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहेच. सर्व राजकीय पक्षांनी द्वेष सोडून मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. शासनाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करणे अपेक्षित आहे. पाणीटंचाई तीव्र असल्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांसह जनावरांना पाण्याची व्यवस्था करावी, तसेच चारा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. त्याठिकाणी शिवसेनेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या दुष्काळामध्ये शिवसेनेच्या वतीने २ हजार शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे विवाह मोफत लावले होते. हा प्रयोग देखील यावर्षी करण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी यावेळी दिली.तुम्ही सरकारमध्ये आहात; मग शासनाच्या वतीने उपाययोजना का राबवल्या जात नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना कदम म्हणाले की, आम्ही सरकारला टेकू लावलेला आहे. त्यामुळे सत्तेत असून नसल्यासारखे आहोत. दुष्काळी भागात मदत देणे हा सामाजिक उपक्रम आहे आणि शिवसेनेचे सर्व मंत्री व पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमgovernment schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ