शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

शासनाकडून शेतकऱ्यांना किती मदत मिळाली ?- कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:30 IST

शासनाकडून शेतक-यांना किती मदत मिळाली हे सर्वांनाच माहिती आहे, असा प्रश्न पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीत शासनाकडून शेतक-यांना किती मदत मिळाली हे सर्वांनाच माहिती आहे, असा प्रश्न पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला. त्यामुळे शेतक-यांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम राबवला जाणार आहे. ९ जानेवारीपासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात बीडमधून होणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी कदम बीडमध्ये आले आहेत. यावेळी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी ही माहिती दिली.यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे, औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, कुंडलिक खांडे, बाबासाहेब पिंगळे, चंद्रकांत नवले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना कदम म्हणाले मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहेच. सर्व राजकीय पक्षांनी द्वेष सोडून मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. शासनाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करणे अपेक्षित आहे. पाणीटंचाई तीव्र असल्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांसह जनावरांना पाण्याची व्यवस्था करावी, तसेच चारा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. त्याठिकाणी शिवसेनेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या दुष्काळामध्ये शिवसेनेच्या वतीने २ हजार शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे विवाह मोफत लावले होते. हा प्रयोग देखील यावर्षी करण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी यावेळी दिली.तुम्ही सरकारमध्ये आहात; मग शासनाच्या वतीने उपाययोजना का राबवल्या जात नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना कदम म्हणाले की, आम्ही सरकारला टेकू लावलेला आहे. त्यामुळे सत्तेत असून नसल्यासारखे आहोत. दुष्काळी भागात मदत देणे हा सामाजिक उपक्रम आहे आणि शिवसेनेचे सर्व मंत्री व पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमgovernment schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ