शहरं
Join us  
Trending Stories
1
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
2
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
3
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
4
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
5
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
6
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
7
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
8
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
9
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
10
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
11
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
12
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
13
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
14
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
15
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
16
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
17
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
18
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
19
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
20
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून शेतकऱ्यांना किती मदत मिळाली ?- कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:30 IST

शासनाकडून शेतक-यांना किती मदत मिळाली हे सर्वांनाच माहिती आहे, असा प्रश्न पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीत शासनाकडून शेतक-यांना किती मदत मिळाली हे सर्वांनाच माहिती आहे, असा प्रश्न पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थित केला. त्यामुळे शेतक-यांना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कार्यक्रम राबवला जाणार आहे. ९ जानेवारीपासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात बीडमधून होणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी कदम बीडमध्ये आले आहेत. यावेळी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी ही माहिती दिली.यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे, औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, कुंडलिक खांडे, बाबासाहेब पिंगळे, चंद्रकांत नवले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना कदम म्हणाले मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहेच. सर्व राजकीय पक्षांनी द्वेष सोडून मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. शासनाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करणे अपेक्षित आहे. पाणीटंचाई तीव्र असल्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांसह जनावरांना पाण्याची व्यवस्था करावी, तसेच चारा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. त्याठिकाणी शिवसेनेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या दुष्काळामध्ये शिवसेनेच्या वतीने २ हजार शेतकरी कुटुंबातील मुलामुलींचे विवाह मोफत लावले होते. हा प्रयोग देखील यावर्षी करण्यात येईल, अशी माहिती कदम यांनी यावेळी दिली.तुम्ही सरकारमध्ये आहात; मग शासनाच्या वतीने उपाययोजना का राबवल्या जात नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना कदम म्हणाले की, आम्ही सरकारला टेकू लावलेला आहे. त्यामुळे सत्तेत असून नसल्यासारखे आहोत. दुष्काळी भागात मदत देणे हा सामाजिक उपक्रम आहे आणि शिवसेनेचे सर्व मंत्री व पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमgovernment schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ