शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

बीड जिल्ह्यात ११६ शेतकरी कुटुंबांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:34 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समाज कल्याण, पशु संवर्धन, पंचायत तसेच ग्रामीण पाणी पुरवठा इ. विविध योजनांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली. तर आत्महत्याग्रस्त ११६ शेतकरी कुटुंबांना लवकरच प्रत्येकी २५ हजार रुपये मदत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना या सभेत करण्यात आल्या.समाजकल्याण अंतर्गत २०१७-१८ मधील प्राप्त २८ कोटी रुपयांच्या ...

बीड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समाज कल्याण, पशु संवर्धन, पंचायत तसेच ग्रामीण पाणी पुरवठा इ. विविध योजनांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली. तर आत्महत्याग्रस्त ११६ शेतकरी कुटुंबांना लवकरच प्रत्येकी २५ हजार रुपये मदत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना या सभेत करण्यात आल्या.

समाजकल्याण अंतर्गत २०१७-१८ मधील प्राप्त २८ कोटी रुपयांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली. या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत पाणी पुरवठा, सभागृह, रस्ता व नाल्यांची कामे होणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेसमधून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यास सभेची मान्यता घेऱ्यात आली.

या सभेत आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीचा विषय चर्चेला आल्यानंतर ११६ शेतकºयांची नावे प्राप्त असून त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठीची कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले. हंगामी वसतिगृहांच्या कारभाराबाबत चौकशीची मागणी जि. प. सदस्य अशोक लोढा यांनी केली. त्यावेळी सर्व हंगामी वसतिगृहांना भेटी देऊन तपासणी करण्यात आल्या असून पारदर्शिता आणलेली आहे. तरीही तक्रार असेल तर चौकशी करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

बायोमेट्रिक तपासूनच वसतिगृहांची बिले अदा करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यावेळी राष्टÑपती पुरस्कारप्राप्त जरेवाडीचे शिक्षक संदीप पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. तर बांधकाम विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता कारंजे हे सेवानिवृत्त होत असल्याबद्दल सेवागौरव करण्यात आला. या सभेस अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्ष जयश्री मस्के, सभापती संतोष हंगे, राजेसाहेब देशमुख, युधाजित पंडित , सर्व जि. प. सदस्य तसेच सीईओ अमोल येडगे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, मधुकर वासनिक तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.मानधन वाढीचा ठराव अन् काटकसरीचा सल्लासभेत जि.प. सदस्यांचे मानधन ३ हजारावरुन २५ हजार रुपये इतके वाढवावे, असा ठराव राष्टÑवादी कॉँग्रेसचे जि. प. सदस्य कल्याण आबुज यांनी मांडला. त्यास गटनेते बजरंग सोनवणे यांनी अनुमोदन दिले.महागाई व इतर कारणांमुळे मानधनात वाढ करण्याची ही मागणी होती. यावर समाजकल्याण सभापती संतोष हंगे यांनी जिल्हा परिषदेची आर्थिक परिस्थिती पाहता असा निर्णय घेणे चुकीचे ठरेल, परिस्थिती सुधारल्यानंतर पाहू असे सांगत काटकसरीचा सल्ला दिला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा