शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बीड जिल्ह्यात ११६ शेतकरी कुटुंबांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:34 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समाज कल्याण, पशु संवर्धन, पंचायत तसेच ग्रामीण पाणी पुरवठा इ. विविध योजनांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली. तर आत्महत्याग्रस्त ११६ शेतकरी कुटुंबांना लवकरच प्रत्येकी २५ हजार रुपये मदत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना या सभेत करण्यात आल्या.समाजकल्याण अंतर्गत २०१७-१८ मधील प्राप्त २८ कोटी रुपयांच्या ...

बीड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समाज कल्याण, पशु संवर्धन, पंचायत तसेच ग्रामीण पाणी पुरवठा इ. विविध योजनांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली. तर आत्महत्याग्रस्त ११६ शेतकरी कुटुंबांना लवकरच प्रत्येकी २५ हजार रुपये मदत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना या सभेत करण्यात आल्या.

समाजकल्याण अंतर्गत २०१७-१८ मधील प्राप्त २८ कोटी रुपयांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली. या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत पाणी पुरवठा, सभागृह, रस्ता व नाल्यांची कामे होणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेसमधून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यास सभेची मान्यता घेऱ्यात आली.

या सभेत आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीचा विषय चर्चेला आल्यानंतर ११६ शेतकºयांची नावे प्राप्त असून त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठीची कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले. हंगामी वसतिगृहांच्या कारभाराबाबत चौकशीची मागणी जि. प. सदस्य अशोक लोढा यांनी केली. त्यावेळी सर्व हंगामी वसतिगृहांना भेटी देऊन तपासणी करण्यात आल्या असून पारदर्शिता आणलेली आहे. तरीही तक्रार असेल तर चौकशी करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

बायोमेट्रिक तपासूनच वसतिगृहांची बिले अदा करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यावेळी राष्टÑपती पुरस्कारप्राप्त जरेवाडीचे शिक्षक संदीप पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. तर बांधकाम विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता कारंजे हे सेवानिवृत्त होत असल्याबद्दल सेवागौरव करण्यात आला. या सभेस अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्ष जयश्री मस्के, सभापती संतोष हंगे, राजेसाहेब देशमुख, युधाजित पंडित , सर्व जि. प. सदस्य तसेच सीईओ अमोल येडगे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, मधुकर वासनिक तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.मानधन वाढीचा ठराव अन् काटकसरीचा सल्लासभेत जि.प. सदस्यांचे मानधन ३ हजारावरुन २५ हजार रुपये इतके वाढवावे, असा ठराव राष्टÑवादी कॉँग्रेसचे जि. प. सदस्य कल्याण आबुज यांनी मांडला. त्यास गटनेते बजरंग सोनवणे यांनी अनुमोदन दिले.महागाई व इतर कारणांमुळे मानधनात वाढ करण्याची ही मागणी होती. यावर समाजकल्याण सभापती संतोष हंगे यांनी जिल्हा परिषदेची आर्थिक परिस्थिती पाहता असा निर्णय घेणे चुकीचे ठरेल, परिस्थिती सुधारल्यानंतर पाहू असे सांगत काटकसरीचा सल्ला दिला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा