शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कार-रिक्षाची जोरदार धडक; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:03 IST

गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार ...

ठळक मुद्देतीन गंभीर जखमी। कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील मादळमोहीची घटना

गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार झाले. तर, तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर कार चालकासह सर्वचजण फरार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान मादळमोही पोलीस तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मादळमोही हे बाजारपेठेचे गाव आहे. येथून अ‍ॅपेरिक्षा (एम.एच.२० यु.४१५७) हा प्रवासी घेऊन पाडळसिंगीकडे निघाला होता. एक किलोमीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या कार (एम.एच.२१ ए.एक्स.५३०३) ने रिक्षाला जोराची धडक दिली. गाडीच्या धडकेने रिक्षा महामार्गाच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळला. यामध्ये रिक्षाचालक असिफ शेख (रा. मादळमोही) व सुनिल शिंगाडे (रा. शिंगारवाडी ता. गेवराई) हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षामधील अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, हा अपघात घडल्यानंतर तात्काळ मादळमोहीच्या ग्रास्थांनी जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवले. अपघात घडताच कार तेथेच सोडून कारचालक व इतरांनी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.अपघातांची संख्या वाढलीकल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत अनेक छोटी-छोटी गावे, वाड्या वस्त्या आहेत. त्याठिकाणी परिवहन महामंडळाची बस जात नाही. त्यामुळे पर्याय नसल्यामुळे या गावांमधील नारिकांना खासगी रिक्षातून प्रवास करावा लागतो. दरम्यान महामार्ग असल्यामुळे इतर वाहनांचा वेग हा कायम वाढलेला असतो. त्यामुळे मागील वर्षात रिक्षा व इतर वाहनांमध्ये होणाऱ्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अपघात होण्याची नेमकी कारणं शोधून उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, महामार्गाशी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू