शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कार-रिक्षाची जोरदार धडक; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:03 IST

गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार ...

ठळक मुद्देतीन गंभीर जखमी। कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील मादळमोहीची घटना

गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार झाले. तर, तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर कार चालकासह सर्वचजण फरार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान मादळमोही पोलीस तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मादळमोही हे बाजारपेठेचे गाव आहे. येथून अ‍ॅपेरिक्षा (एम.एच.२० यु.४१५७) हा प्रवासी घेऊन पाडळसिंगीकडे निघाला होता. एक किलोमीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या कार (एम.एच.२१ ए.एक्स.५३०३) ने रिक्षाला जोराची धडक दिली. गाडीच्या धडकेने रिक्षा महामार्गाच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळला. यामध्ये रिक्षाचालक असिफ शेख (रा. मादळमोही) व सुनिल शिंगाडे (रा. शिंगारवाडी ता. गेवराई) हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षामधील अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, हा अपघात घडल्यानंतर तात्काळ मादळमोहीच्या ग्रास्थांनी जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवले. अपघात घडताच कार तेथेच सोडून कारचालक व इतरांनी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.अपघातांची संख्या वाढलीकल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत अनेक छोटी-छोटी गावे, वाड्या वस्त्या आहेत. त्याठिकाणी परिवहन महामंडळाची बस जात नाही. त्यामुळे पर्याय नसल्यामुळे या गावांमधील नारिकांना खासगी रिक्षातून प्रवास करावा लागतो. दरम्यान महामार्ग असल्यामुळे इतर वाहनांचा वेग हा कायम वाढलेला असतो. त्यामुळे मागील वर्षात रिक्षा व इतर वाहनांमध्ये होणाऱ्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अपघात होण्याची नेमकी कारणं शोधून उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, महामार्गाशी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू