शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कार-रिक्षाची जोरदार धडक; दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:03 IST

गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार ...

ठळक मुद्देतीन गंभीर जखमी। कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील मादळमोहीची घटना

गेवराई : भरधाव वेगातील कारने प्रवासी घेऊन चाललेल्या अँपेरिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षामधील दोन जण जागीच ठार झाले. तर, तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर कार चालकासह सर्वचजण फरार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान मादळमोही पोलीस तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मादळमोही हे बाजारपेठेचे गाव आहे. येथून अ‍ॅपेरिक्षा (एम.एच.२० यु.४१५७) हा प्रवासी घेऊन पाडळसिंगीकडे निघाला होता. एक किलोमीटर अंतरावर पाठीमागून आलेल्या कार (एम.एच.२१ ए.एक्स.५३०३) ने रिक्षाला जोराची धडक दिली. गाडीच्या धडकेने रिक्षा महामार्गाच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळला. यामध्ये रिक्षाचालक असिफ शेख (रा. मादळमोही) व सुनिल शिंगाडे (रा. शिंगारवाडी ता. गेवराई) हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षामधील अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, हा अपघात घडल्यानंतर तात्काळ मादळमोहीच्या ग्रास्थांनी जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवले. अपघात घडताच कार तेथेच सोडून कारचालक व इतरांनी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.अपघातांची संख्या वाढलीकल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत अनेक छोटी-छोटी गावे, वाड्या वस्त्या आहेत. त्याठिकाणी परिवहन महामंडळाची बस जात नाही. त्यामुळे पर्याय नसल्यामुळे या गावांमधील नारिकांना खासगी रिक्षातून प्रवास करावा लागतो. दरम्यान महामार्ग असल्यामुळे इतर वाहनांचा वेग हा कायम वाढलेला असतो. त्यामुळे मागील वर्षात रिक्षा व इतर वाहनांमध्ये होणाऱ्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अपघात होण्याची नेमकी कारणं शोधून उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, महामार्गाशी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू