शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पावसाचा कहर ! स्मशानभूमीत ही गुढगाभर पाणी, अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 18:37 IST

या तलावाचे पाणी सांडव्याद्वारे बाहेर काढून देण्यात आले आहे. मात्र तो प्रवाह अत्यल्प असल्याने स्मशानभूमीत मोठया प्रमाणात पाणी येते.

अंबाजोगाई-: माणसाचा शेवट तरी गोड व्हावा.असे म्हणले जाते.मात्र अतिवृष्टीमुळे अंबाजोगाईत शेवटचा प्रवासही त्रासदायक ठरला आहे. गुढगाभर पाण्यात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाईकरांवर आली आहे.

अंबाजोगाई शहरातील रविवारपेठ परिसरातील बोरूळतलाव स्मशानभूमी बोरूळ तलावाच्या काठावर आहे.अंबाजोगाईत सतत पडणणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव ओसंडुन वाहू लागला आहे.दिवसेंदिवस नद्या,तलाव यांची पाणीपातळी वाढू लागली आहे. परिणामी बोरूळ तलाव स्मशानभूमी च्या परिसरात ही पाणी मोठया प्रमाणात साठले आहे.शहरातील बहुतांश अंत्यविधी याच स्मशानभूमीत होतात. 

या ठिकाणी मोठया प्रमाणात साठलेल्या पाण्यामुळे अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या तलावाचे पाणी सांडव्याद्वारे बाहेर काढून देण्यात आले आहे. मात्र तो प्रवाह अत्यल्प असल्याने स्मशानभूमीत मोठया प्रमाणात पाणी येते.या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने  शेवटच्या प्रवासासातही मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.

टॅग्स :RainपाऊसBeedबीड