शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'पिकांचा पंचनामा करा'; आडसमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 19:31 IST

आठवडी बाजार असल्याने रस्त्यावर वाहनांच्या लागल्या रांगा

केज (बीड ) : तालुक्यातील आडस परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. धारूर-अंबाजोगाई रस्त्यावरील शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि. ३१) सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आडस परिसरात मागील दोन वर्षांपासून पावसाने अवकृपा केली आहे. पावसाळ्याचे अर्धे दिवस होऊनही सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस आहे. यामुळे खरीपाची पिके करपली आहेत.अल्प मुदतीची पिके फुलोऱ्यात व शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पूर्णपणे करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती कांहीच लागणार नाही. जवळ होते नव्हते ते पेरणीत खर्च झाल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा सन-२०१७ चा खरीपाच्या पिकांचा विमा, सन-२०१८ हंगामातील तांत्रिक अडचणीमुळे न मिळालेला पिकविमा वाटत करावा, चालू हंगामात पिकविम्यासाठी बँक कर्मचाऱ्यांकडून होणारी अडवणूक थांबवावी, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने दावणीला चारा द्यावा अशा या मागण्यांसाठी शनिवारी अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार आशा वाघ यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

आंदोलनात बाळासाहेब देशमुख, शिवरूद्र आकुसकर, उद्धवराव इंगोले, सरपंच बालासाहेब ढोले, शिवसेनेचे विकास काशिद, गजानन देशमुख, रमेश ठाकुर, राजाभाऊ देशमुख, वैभव इंगोले, इसाक शेख, गोविंद पाटील, बालासाहेब आकुसकर यांच्यासह आडस परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीState Governmentराज्य सरकारRainपाऊस