शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

'पिकांचा पंचनामा करा'; आडसमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 19:31 IST

आठवडी बाजार असल्याने रस्त्यावर वाहनांच्या लागल्या रांगा

केज (बीड ) : तालुक्यातील आडस परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. धारूर-अंबाजोगाई रस्त्यावरील शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि. ३१) सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आडस परिसरात मागील दोन वर्षांपासून पावसाने अवकृपा केली आहे. पावसाळ्याचे अर्धे दिवस होऊनही सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस आहे. यामुळे खरीपाची पिके करपली आहेत.अल्प मुदतीची पिके फुलोऱ्यात व शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पूर्णपणे करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती कांहीच लागणार नाही. जवळ होते नव्हते ते पेरणीत खर्च झाल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा सन-२०१७ चा खरीपाच्या पिकांचा विमा, सन-२०१८ हंगामातील तांत्रिक अडचणीमुळे न मिळालेला पिकविमा वाटत करावा, चालू हंगामात पिकविम्यासाठी बँक कर्मचाऱ्यांकडून होणारी अडवणूक थांबवावी, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने दावणीला चारा द्यावा अशा या मागण्यांसाठी शनिवारी अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार आशा वाघ यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

आंदोलनात बाळासाहेब देशमुख, शिवरूद्र आकुसकर, उद्धवराव इंगोले, सरपंच बालासाहेब ढोले, शिवसेनेचे विकास काशिद, गजानन देशमुख, रमेश ठाकुर, राजाभाऊ देशमुख, वैभव इंगोले, इसाक शेख, गोविंद पाटील, बालासाहेब आकुसकर यांच्यासह आडस परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीState Governmentराज्य सरकारRainपाऊस