शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हारतुरे न स्वीकारता ग्रंथभेट चळवळ व्हावी - सुरेश धस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 13:41 IST

कोणत्याही समारंभात हारतुर्‍यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्‍या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले. 

अंबाजोगाई (बीड) : कोणत्याही समारंभात हारतुर्‍यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्‍या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले. 

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनातील  ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सुरेश धस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, रमेशराव आडसकर, संजय दौंड, हनुमंतराव मोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

सुरेश धस म्हणाले की, दर्जेदार व दुर्मिळ पुस्तकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. ही पुस्तके व ग्रंथ समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचले तर अनेक प्रकारचे अज्ञान या माध्यमातून दूर होईल.  पुढे बोलताना ते म्हणाले की, समस्यांचा हुंदका हा साहित्याचा एक भाग आहे. राजकीय विचारधारेवर साहित्याचं प्रतिबिंब उमटलेलं असतं त्यामुळं साहित्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या या भरकटलेल्या पिढीला वाचन चळवळीतूनच प्रेरणा मिळेल. ग्रंथ हेच खरे गुरू असून प्रत्येकाच्या घराघरातील कापाटात पुस्तकांना प्रतिष्ठा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त यावेळी केली. 

संमेलनात मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या विविध प्रकाशकांचे ग्रंथ प्रदर्शन व ४५ विक्री केंदे्र लक्ष वेधत होती. सोमवारपर्यंत प्रदर्शन राहणार असून, दुर्मिळ ग्रंथ येथे उपलब्ध झाले आहेत.

सेल्फी स्थळ ठरले संमेलनाचे आकर्षणया संमेलनानिमित्त संमेलनस्थळी निर्माण करण्यात आलेले  ‘सेल्फी स्थळ’ गर्दी खेचून घेत आहे. संमेलनस्थळी ७ फुट उंचीचे हे स्थळ निर्माण करण्यात आलेला असून साहित्याचे प्रतिनिधित्व करणा-या पुस्तक, दौत, लेखणी आणि मोरपीस या साधनातून या सेल्फी स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ७ फुट उंचीचा हा ‘सेल्फी कट्टा’ संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या आद्यकवी मुकुंदराज कटटा आकर्षक ठरत असून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Marathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलनBeedबीडliteratureसाहित्य