शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गारांच्या तडाख्याने हिरावला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:54 IST

पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादूर्भाव होत असतानाच रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे माजलगाव, गेवराई, शिरुर कासार, वडवणी तालुक्यामध्ये रबीची पिके तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, जवळपास ६०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, दुपारी अंबाजोगाई व परळी तालुक्यात पावसाने सौम्य हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील खळेगाव, पौळाचीवाडी, उमापूर येथे रविवारी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यात हरभरा, ज्वारी, गहू, पपई, मोसंबी, आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.सकाळी ७ वाजता गेवराई शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील खळेगाव, पौळाचीवाडी, उमापूर, पांचाळेश्वर, बोरीपिंपळगाव, धुमेगाव, महांडुळा, सुरळेगाव, राक्षसभुवनसह अनेक गावांमध्ये गारपीट व वादळी वाºयाने शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खळेगावचे शेतकरी मच्छिंद्र गावडे व मनोज शेंबडे यांनी केली आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची महसूल यंत्रणेने पाहणी केली असून दोन दिवसात सर्व पंचनामे करण्यात येतील, असे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले.वडवणीत टरबूज, हरभ-याचे नुकसानवडवणी : तालुक्यातील कवडगाव, देवडी, साळिंबा, पिंपरखेड, मामला, चिंचोटी परिसरात अवकाळी पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. सकाळी ६ च्या सुमारास दहा मिनिटे गारासह पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील गहू आणि ज्वारीचे नुकसान झाले तर टरबूज व इतर फळबागांचे ही नुकसान झाले आहे . तर काढणीसाठी आलेल्या हरभºयाचे घाटे गारांमुळे गळून पडले आहेत. तहसील कार्यालयाचे नैसर्गिक आपत्तीचे एस. दिरंगे म्हणाले की, तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शिरुरात रबीची पिके आडवीशिरूर कासार : तालुक्यात तिंतरवणी महसूल मंडळात गारांसह तब्ब्ल आठ मिलीमीटर पाऊस झाला तर शिरूर कासार मंडळात तुरळक गारांसह दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायमोहा मंडळ निरंक असल्याची माहिती अव्वल कारकून रामराव बडे यांनी दिली.तिंतरवणीसह तागडगाव, फुलसांगवी, पाडळी, आर्वी, खालापुरी भागात अवकाळी पावसासह गारांचाही तडाखा बसला. गहू, मका पीक आडवे झाले असून काढणी केलेला हरभरा, तुरी भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.रायमोह व शिरूर कासार परिमंडळात गारपिटीचे विघ्न टाळले असले तरी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणखी दोन ते तीन दिवस गारपिटीचे हे भूत शेतकºयांना भीती दाखवत आहे.माजलगावामध्ये फळबागांना फटकामाजलगाव : तालुक्याच्या काही भागात विशेषत: गोदावरी नदीकाठच्या गावांना गारपीटीने झोडपले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. गोदावरी काठच्या काळेगाव, हिवरा, डुब्बाथडी, टाकरवन, सुल्तानपुर, वाघोरा, वारोळा, राजेगाव, तालखेड, मंगरूळ आदी गावात अर्धा तास लिंबाएवढ्या गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयात हलकल्लोळ उडाला. या गारपिटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, पपई यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, टरबूज, पपई, आंबा यासह अनेक फळबागांचे नुकसान झाले असून, फळबागा अक्षरश: भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पंचनामे सुरु आहेतगारपिटीने नुकसान झालेल्या शेतशिवारात महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक सुरेश पळवदे सह अन्य कर्मचारी पाहणी करुन नुकसान क्षेत्राचा पीकनिहाय आढावा घेत असून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.- बालाजी शेवाळेतहसीलदारपालकमंत्र्यांचे पंचनाम्याचे जिल्हाधिकाºयांना आदेशजिल्ह्याला गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. हाच धागा पकडून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त गावांना तातडीने भेटी देण्याच्या सूचना त्यांनी आमदारांना केल्या आहेत. नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असून शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असेही पालकमंत्री पंकजा मुंंडे यांनी सांगितले.