शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

गारांच्या तडाख्याने हिरावला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:54 IST

पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादूर्भाव होत असतानाच रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे माजलगाव, गेवराई, शिरुर कासार, वडवणी तालुक्यामध्ये रबीची पिके तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, जवळपास ६०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, दुपारी अंबाजोगाई व परळी तालुक्यात पावसाने सौम्य हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील खळेगाव, पौळाचीवाडी, उमापूर येथे रविवारी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यात हरभरा, ज्वारी, गहू, पपई, मोसंबी, आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.सकाळी ७ वाजता गेवराई शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील खळेगाव, पौळाचीवाडी, उमापूर, पांचाळेश्वर, बोरीपिंपळगाव, धुमेगाव, महांडुळा, सुरळेगाव, राक्षसभुवनसह अनेक गावांमध्ये गारपीट व वादळी वाºयाने शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खळेगावचे शेतकरी मच्छिंद्र गावडे व मनोज शेंबडे यांनी केली आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची महसूल यंत्रणेने पाहणी केली असून दोन दिवसात सर्व पंचनामे करण्यात येतील, असे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले.वडवणीत टरबूज, हरभ-याचे नुकसानवडवणी : तालुक्यातील कवडगाव, देवडी, साळिंबा, पिंपरखेड, मामला, चिंचोटी परिसरात अवकाळी पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. सकाळी ६ च्या सुमारास दहा मिनिटे गारासह पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील गहू आणि ज्वारीचे नुकसान झाले तर टरबूज व इतर फळबागांचे ही नुकसान झाले आहे . तर काढणीसाठी आलेल्या हरभºयाचे घाटे गारांमुळे गळून पडले आहेत. तहसील कार्यालयाचे नैसर्गिक आपत्तीचे एस. दिरंगे म्हणाले की, तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.शिरुरात रबीची पिके आडवीशिरूर कासार : तालुक्यात तिंतरवणी महसूल मंडळात गारांसह तब्ब्ल आठ मिलीमीटर पाऊस झाला तर शिरूर कासार मंडळात तुरळक गारांसह दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायमोहा मंडळ निरंक असल्याची माहिती अव्वल कारकून रामराव बडे यांनी दिली.तिंतरवणीसह तागडगाव, फुलसांगवी, पाडळी, आर्वी, खालापुरी भागात अवकाळी पावसासह गारांचाही तडाखा बसला. गहू, मका पीक आडवे झाले असून काढणी केलेला हरभरा, तुरी भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.रायमोह व शिरूर कासार परिमंडळात गारपिटीचे विघ्न टाळले असले तरी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणखी दोन ते तीन दिवस गारपिटीचे हे भूत शेतकºयांना भीती दाखवत आहे.माजलगावामध्ये फळबागांना फटकामाजलगाव : तालुक्याच्या काही भागात विशेषत: गोदावरी नदीकाठच्या गावांना गारपीटीने झोडपले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. गोदावरी काठच्या काळेगाव, हिवरा, डुब्बाथडी, टाकरवन, सुल्तानपुर, वाघोरा, वारोळा, राजेगाव, तालखेड, मंगरूळ आदी गावात अर्धा तास लिंबाएवढ्या गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयात हलकल्लोळ उडाला. या गारपिटीमुळे गहू, ज्वारी, हरभरा, पपई यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डाळिंब, टरबूज, पपई, आंबा यासह अनेक फळबागांचे नुकसान झाले असून, फळबागा अक्षरश: भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पंचनामे सुरु आहेतगारपिटीने नुकसान झालेल्या शेतशिवारात महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक सुरेश पळवदे सह अन्य कर्मचारी पाहणी करुन नुकसान क्षेत्राचा पीकनिहाय आढावा घेत असून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.- बालाजी शेवाळेतहसीलदारपालकमंत्र्यांचे पंचनाम्याचे जिल्हाधिकाºयांना आदेशजिल्ह्याला गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. हाच धागा पकडून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त गावांना तातडीने भेटी देण्याच्या सूचना त्यांनी आमदारांना केल्या आहेत. नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असून शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असेही पालकमंत्री पंकजा मुंंडे यांनी सांगितले.