शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

तासिका तत्त्वावरील गुरुजी शेतमजुरीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

बीड : राज्यात हजारो सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त असताना गेल्या दहा वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदाच्या १८ हजार ...

बीड : राज्यात हजारो सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त असताना गेल्या दहा वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदाच्या १८ हजार जागा रिक्त आहेत आणि याच्या उलट हजारो पात्रताधारक तरुण उमेदवार बेरोजगार आहेत. तासिका तत्त्वावर अनेक प्राध्यापक काम करीत आहेत. कमी मानधनामुळे अनेकांना मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे.

पीएच.डी., नेटसेट झालेले तासिका तत्त्वावरील प्राध्यापक शेतमजुरीवर किंवा पर्यायी रोजगार शोधत आयुष्याची कसरत करीत आहेत. विद्यमान असो अथवा मागील राज्य सरकार प्रत्येक वर्षी आम्ही जागा रिक्त पदे भरू, अशी पोकळ आश्वासने देऊन या तरुणांना झुलवत ठेवले आहे. मात्र, आता हे तरुण या आश्वासनांना कंटाळून गेल्या दीड महिन्यापासून पुणे येथील उच्च शिक्षण आयुक्ताच्या कार्यालयापुढे उपोषणास बसले आहेत. सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी या तरुणांची आहे. सरकारला जागा भरायच्या नसतील, तर मानधनात भरघोस वाढ करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

किती दिवस जगायचे असे?

मी १० वर्षांपासून तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापक म्हणून काम करतोय. नऊ ते दहा महिने अध्यापनातून निव्वळ ४० ते ५० हजार हाती पडतात. महागाईच्या काळात तुटपुंज्या मानधनावर जगायचं कसं? कोरोनाकाळात वर्षभर मी शेतात राबलो. सरकारने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना स्वाभिमानाने जगता यावे, इतपत मानधनवाढ करावी. - डॉ. महेश वाघमारे, बीड

----------

मागील १० वर्षांपासून तासिका तत्त्वावरील काम म्हणजे निव्वळ गुलामी वाटते. स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या उच्चशिक्षित नोकरीतून भागवू शकत नाही, म्हणून शिकवणीवर्गापासून ते शेतीतील मोलमजुरी करून पोटाला चिमटे देत जगत आलो आहोत. शासनाने आता तरी सेट, नेट, पीएच.डी.धारकांचा अंत पाहू नये. - डॉ. महादेव जगताप, बीड

---------

उच्चविद्याविभूषित होऊनदेखील आज माझ्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा पूर्ण होत नाहीत. भाऊ, मित्र, नातेवाइकांच्या सहकार्याने परिवाराचा उदरनिर्वाह चालू आहे. मृत्यूपेक्षा हे जीवन भयंकर आहे. माझ्यासारखे असंख्य तरुण आज, उद्या जागा निघतील आणि आपण प्राध्यापक होऊ, अशी आशा घेऊन जगत आहेत. - बाबासाहेब जावळे, बीड

---------

सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच

राज्यात प्रत्येक वर्षी सेट-नेट आणि पेट परीक्षा होत आहेत. हजारो पात्रताधारक उमेदवार नव्याने तयार केले जात आहेत. सेट-नेट आणि पीएच.डी.धारक उमेदवारांची संख्या वाढत आहे. गेल्या १० वर्षांपासून मागील व सध्याच्या सरकारनेही सहायक प्राध्यापक भरतीला स्थगिती दिली आहे. यामुळे काही पात्रताधारक उमेदवारांना तासिका तत्त्वावर अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे.

------------

१० वर्षांपासून लटकला प्रश्न

दहा वर्षांपासून हा प्रश्न रखडल्याने काही पात्रताधारक शेतात मजुरी करत आहेत, काही जण तर अगदी भाजीपाला, फळविक्री यासारखी कामेसुद्धा लाज सोडून करत आहेत. वर्षानुवर्षे अभ्यास करून ज्या तरुणांनी प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहिलं, त्यांच्यावर अशी वेळ यावी, हे या व्यवस्थेचं अपयश असल्याचे तासिका तत्त्वावरील प्राध्यापक सांगतात.

-------