शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

दु:खाची काजळी विसरून जीवनात रंग भरण्यासाठी टाकतात गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 06:22 IST

मागील वर्षभरात ज्याच्या घरी दु:खद प्रसंग ओढवला त्या कुटुंबांना बोलावून दु:ख विसरून जीवनात रंग भरावेत म्हणून समाजाच्या वतीने गुलाल टाकून, मिठाई भरवून गोड करण्याची परंपरा येथील सिंधी-पंजाबी समाजाने जपली आहे.

- अनिल भंडारी बीड : मनभेद, मतभेद विसरत रंगांची उधळण करीत होळीचा सण सर्वत्र आनंद आणि जल्लोषात साजरा केला जातो. मागील वर्षभरात ज्याच्या घरी दु:खद प्रसंग ओढवला त्या कुटुंबांना बोलावून दु:ख विसरून जीवनात रंग भरावेत म्हणून समाजाच्या वतीने गुलाल टाकून, मिठाई भरवून गोड करण्याची परंपरा येथील सिंधी-पंजाबी समाजाने जपली आहे. यंदा कोरोनामुळे अडचणी असल्यातरी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत यंदाच्या धुलिवंदनाला साधेपणाने रंग भरले जाणार आहेत. व्यापार, उद्याेगासाठी मागील ६०-६५ वर्षांपासून सिंधी पंजाबी समाज इथल्या मातीत मिसळला आहे. सर्वधर्मीय सण , उत्सवात सहभागी होणाऱ्या सिंधी- पंजाबी बांधवांनी आपल्या समाजाची परंपरादेखील जपली आहे.  शहरात या समाजाची ५० ते ६० घरे असून लोकसंख्या ७०० च्या घरात आहे. येथील गुरूनानक दरबारात समाजाचे सर्व उपक्रम, जयंती, उत्सव तसेच इतर कार्यक्रम एकोप्याने पार पडतात. वर्षभरात ज्यांच्या घरी दु:ख झाले,  घरातील व्यक्तींचे निधन झाले. त्यांच्या घरी जाऊन किंवा सामुदायिक कार्यक्रमात बोलावून या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली जाते. नंतर त्या कुटुंबीयांवर गुलाल टाकून आनंदात सहभागी होण्यासाठी विनवणी केली जाते. त्यानंतर हे कुटुंब समाजातील सर्व प्रसंगात सहभागी होतात, असा रीतीरिवाज आहे. बीड शहरामध्ये गेल्या  २५ वर्षांपासून हा रिवाज पाळला  जातो. 

टॅग्स :Beedबीड