शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

किराणा ४ तर कृषी दुकाने ७ तास उघडी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा १ जून ...

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा १ जून ते १५ जूनपर्यंत लॉकडाऊन ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. या कालावधीत अत्यावश्यक वस्तू जसे किराणा, भाजीपाला, फळे, चिकन, मटन विक्रीसाठी रोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी या आस्थापना पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ३१ मे रोजी काढले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहायक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डीलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, पेट्रोलपंप, टपाल सेवा इत्यादी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना पूर्णवेळ चालू राहणार आहेत.

तर, दूधविक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सुरू राहील. गॅस वितरण दिवसभर सुरू राहणार आहे. बँक ग्राहक सेवा केंद्रांचे कामकाज शासनाच्या नियमित वेळापत्रकानुसार पूर्ण वेळ सुरू राहणार आहे.

शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. लसीकरणाकरिता ४५ वर्षांवरील ज्या व्यक्तींचा दुसरा डोससाठी मेसेज आला आहे, आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणाचा डोस घेण्यासाठी जाण्यास परवानगी असणार आहे.

कृषी दुकाने ७ ते २

कृषी व्यवसायाशी संबंधित दुकानांमध्ये बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरून घेण्यास मुभा देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना सकाळी ७ ते २ पर्यंत खरेदी करता येणार आहे. नरेगा कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा व कोविडविषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल. स्वस्त धान्य दुकानदारांना सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच लाभार्थींना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. लाभार्थींनी आधार, रेशनकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

जिल्ह्यातील सर्वप्रकारची मद्यविक्री पूर्णवेळ बंद राहणार आहे. १ ते १५ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करण्यात येतील. त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या कमी होत असून, नियमांचे पालन केल्यास जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.