शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

किराणा ४ तर कृषी दुकाने ७ तास उघडी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा १ जून ...

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आणखी प्रभावीपणे ही संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा १ जून ते १५ जूनपर्यंत लॉकडाऊन ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. या कालावधीत अत्यावश्यक वस्तू जसे किराणा, भाजीपाला, फळे, चिकन, मटन विक्रीसाठी रोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी या आस्थापना पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ३१ मे रोजी काढले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहायक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डीलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, पेट्रोलपंप, टपाल सेवा इत्यादी अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना पूर्णवेळ चालू राहणार आहेत.

तर, दूधविक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सुरू राहील. गॅस वितरण दिवसभर सुरू राहणार आहे. बँक ग्राहक सेवा केंद्रांचे कामकाज शासनाच्या नियमित वेळापत्रकानुसार पूर्ण वेळ सुरू राहणार आहे.

शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे २५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. लसीकरणाकरिता ४५ वर्षांवरील ज्या व्यक्तींचा दुसरा डोससाठी मेसेज आला आहे, आरोग्य विभागाचे पत्र आले आहे. त्यांनाच लसीकरणाचा डोस घेण्यासाठी जाण्यास परवानगी असणार आहे.

कृषी दुकाने ७ ते २

कृषी व्यवसायाशी संबंधित दुकानांमध्ये बियाणे, खते, औषधे केवळ गोडाऊनला किंवा दुकानामध्ये उतरून घेण्यास मुभा देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना सकाळी ७ ते २ पर्यंत खरेदी करता येणार आहे. नरेगा कामांच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा व कोविडविषयक जे नियम आहेत ते पाळणे बंधनकारक असेल. स्वस्त धान्य दुकानदारांना सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच लाभार्थींना धान्य वितरण करण्यास मुभा राहील. लाभार्थींनी आधार, रेशनकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

जिल्ह्यातील सर्वप्रकारची मद्यविक्री पूर्णवेळ बंद राहणार आहे. १ ते १५ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करण्यात येतील. त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या कमी होत असून, नियमांचे पालन केल्यास जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.