शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

व्यथा कामगारांच्या; शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाने सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेले कामगार पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाने सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेले कामगार पुन्हा शहरात जाऊन कामाला लागले होते. कसे तरी पूर्ववत होत असताना आता पुन्हा कोरोना वाढला. शासनाने लॉकडाऊन केले आणि पुन्हा हातावरचे काम गेले आहे. त्यामुळे हे कामगार पुन्हा गावाच्या दिशेने परतू लागले आहेत.

राज्यात सर्वत्रच कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूही होत आहेत. या कोरोनाची साखळी थांबविण्यासाठी सर्वत्र कडक निर्बंध घालून काही प्रमाणात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या शहरांतील कंपन्या, हॉटेल, दुकानांवर कामाला असणाऱ्या कामगारांच्या हातचे काम गेले आहे. त्यांची शहरात उपासमार होत आहे. शहरात उपाशी राहण्यापेक्षा ते गावात परतत असल्याचे दिसत आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर सध्या कामगार परतीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसते.

मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची संख्या जास्त

कोरोना हा सर्वसामान्य लोकांसाठी कायम त्रासदायक ठरला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार होत असल्याने शेकडो कामगार गावी आले होते. काहींना तर वाहने नसल्याने पायपीट करून त्यांनी गाव गाठले होते. यात त्यांचे हाल झाले होते.

आता पुन्हा तीच वेळ आली आहे. दुसरे लॉकडाऊनही सुरू झाल्याने हातचे काम गेले आहे. शहरात कामासाठी आलेल्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे ते आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच गावाच्या दिशेने परतू लागले आहेत. बस, रेल्वे, खासगी वाहनांचा ते आधार घेतात.

बीड जिल्ह्यातील कामगार हे सर्वाधिक मुंबई, पुणे येथे कामासाठी गेलेले आहेत. परंतु आता तिथे हाताला काम नाही. त्यामुळे ते आता गावी येत आहेत. तेथे उपाशी राहण्यापेक्षा गावाकडे येऊन जे काम मिळेल ते करण्याची तयारी ते दर्शवत आहेत. पोटापुरता रोजगार मिळाला तरी खूप झाले, अशा प्रतिक्रिया या कामगारांनी व्यक्त केल्या.

हाताला कामच नाही

पुण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला होतो. पहिल्या लॉकडाऊनमध्ये गावी आलो होतो. थोडी ढिल मिळाल्याने पुण्याला गेलो. आता पुन्हा हॉटेल बंद झाल्याने कामच नाही. पगारही बंद आहे. इतरांना जेवण वाढत होतो, आता आम्हालाच उपाशी रहावे लागत आहे.

मंगेश काळे, केज

शेतातील काम येत नाही

पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यामुळे मुंबईला नोकरीसाठी गेलो होतो. २० हजारांची नोकरीही मिळाली. पण आता कंपनीच बंद असल्याने कामावर येऊ नका म्हणून सांगितले. त्यातच शेतातील कामही येत नसल्याने अडचण आहे.

बाबासाहेब पांढरे, बीड

हे दिवस पुन्हा येऊ नयेत रे बाबा...

कोरोनाच्या पहिल्या लाॅकडाऊनमध्ये खूप त्रास झाला. नंतर काही प्रमाणात सुरळीत झाले होते. आता पुन्हा तेच दिवस आले आहेत. परंतु मागील काही महिन्यात जे अनुभवले ते दिवस पुन्हा येऊ नयेत. शहरात उपाशी राहून जगण्यापेक्षा गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जुन शिंदे, बीड

===Photopath===

120421\12_2_bed_5_12042021_14.jpeg

===Caption===

बीड बसस्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी दिसत आहे.