शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यथा कामगारांच्या; शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाने सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेले कामगार पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाने सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेले कामगार पुन्हा शहरात जाऊन कामाला लागले होते. कसे तरी पूर्ववत होत असताना आता पुन्हा कोरोना वाढला. शासनाने लॉकडाऊन केले आणि पुन्हा हातावरचे काम गेले आहे. त्यामुळे हे कामगार पुन्हा गावाच्या दिशेने परतू लागले आहेत.

राज्यात सर्वत्रच कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूही होत आहेत. या कोरोनाची साखळी थांबविण्यासाठी सर्वत्र कडक निर्बंध घालून काही प्रमाणात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या शहरांतील कंपन्या, हॉटेल, दुकानांवर कामाला असणाऱ्या कामगारांच्या हातचे काम गेले आहे. त्यांची शहरात उपासमार होत आहे. शहरात उपाशी राहण्यापेक्षा ते गावात परतत असल्याचे दिसत आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर सध्या कामगार परतीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसते.

मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची संख्या जास्त

कोरोना हा सर्वसामान्य लोकांसाठी कायम त्रासदायक ठरला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार होत असल्याने शेकडो कामगार गावी आले होते. काहींना तर वाहने नसल्याने पायपीट करून त्यांनी गाव गाठले होते. यात त्यांचे हाल झाले होते.

आता पुन्हा तीच वेळ आली आहे. दुसरे लॉकडाऊनही सुरू झाल्याने हातचे काम गेले आहे. शहरात कामासाठी आलेल्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे ते आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच गावाच्या दिशेने परतू लागले आहेत. बस, रेल्वे, खासगी वाहनांचा ते आधार घेतात.

बीड जिल्ह्यातील कामगार हे सर्वाधिक मुंबई, पुणे येथे कामासाठी गेलेले आहेत. परंतु आता तिथे हाताला काम नाही. त्यामुळे ते आता गावी येत आहेत. तेथे उपाशी राहण्यापेक्षा गावाकडे येऊन जे काम मिळेल ते करण्याची तयारी ते दर्शवत आहेत. पोटापुरता रोजगार मिळाला तरी खूप झाले, अशा प्रतिक्रिया या कामगारांनी व्यक्त केल्या.

हाताला कामच नाही

पुण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला होतो. पहिल्या लॉकडाऊनमध्ये गावी आलो होतो. थोडी ढिल मिळाल्याने पुण्याला गेलो. आता पुन्हा हॉटेल बंद झाल्याने कामच नाही. पगारही बंद आहे. इतरांना जेवण वाढत होतो, आता आम्हालाच उपाशी रहावे लागत आहे.

मंगेश काळे, केज

शेतातील काम येत नाही

पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यामुळे मुंबईला नोकरीसाठी गेलो होतो. २० हजारांची नोकरीही मिळाली. पण आता कंपनीच बंद असल्याने कामावर येऊ नका म्हणून सांगितले. त्यातच शेतातील कामही येत नसल्याने अडचण आहे.

बाबासाहेब पांढरे, बीड

हे दिवस पुन्हा येऊ नयेत रे बाबा...

कोरोनाच्या पहिल्या लाॅकडाऊनमध्ये खूप त्रास झाला. नंतर काही प्रमाणात सुरळीत झाले होते. आता पुन्हा तेच दिवस आले आहेत. परंतु मागील काही महिन्यात जे अनुभवले ते दिवस पुन्हा येऊ नयेत. शहरात उपाशी राहून जगण्यापेक्षा गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जुन शिंदे, बीड

===Photopath===

120421\12_2_bed_5_12042021_14.jpeg

===Caption===

बीड बसस्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी दिसत आहे.