शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

व्यथा कामगारांच्या; शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाने सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेले कामगार पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाने सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार झालेले कामगार पुन्हा शहरात जाऊन कामाला लागले होते. कसे तरी पूर्ववत होत असताना आता पुन्हा कोरोना वाढला. शासनाने लॉकडाऊन केले आणि पुन्हा हातावरचे काम गेले आहे. त्यामुळे हे कामगार पुन्हा गावाच्या दिशेने परतू लागले आहेत.

राज्यात सर्वत्रच कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूही होत आहेत. या कोरोनाची साखळी थांबविण्यासाठी सर्वत्र कडक निर्बंध घालून काही प्रमाणात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या शहरांतील कंपन्या, हॉटेल, दुकानांवर कामाला असणाऱ्या कामगारांच्या हातचे काम गेले आहे. त्यांची शहरात उपासमार होत आहे. शहरात उपाशी राहण्यापेक्षा ते गावात परतत असल्याचे दिसत आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर सध्या कामगार परतीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसते.

मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची संख्या जास्त

कोरोना हा सर्वसामान्य लोकांसाठी कायम त्रासदायक ठरला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपासमार होत असल्याने शेकडो कामगार गावी आले होते. काहींना तर वाहने नसल्याने पायपीट करून त्यांनी गाव गाठले होते. यात त्यांचे हाल झाले होते.

आता पुन्हा तीच वेळ आली आहे. दुसरे लॉकडाऊनही सुरू झाल्याने हातचे काम गेले आहे. शहरात कामासाठी आलेल्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे ते आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच गावाच्या दिशेने परतू लागले आहेत. बस, रेल्वे, खासगी वाहनांचा ते आधार घेतात.

बीड जिल्ह्यातील कामगार हे सर्वाधिक मुंबई, पुणे येथे कामासाठी गेलेले आहेत. परंतु आता तिथे हाताला काम नाही. त्यामुळे ते आता गावी येत आहेत. तेथे उपाशी राहण्यापेक्षा गावाकडे येऊन जे काम मिळेल ते करण्याची तयारी ते दर्शवत आहेत. पोटापुरता रोजगार मिळाला तरी खूप झाले, अशा प्रतिक्रिया या कामगारांनी व्यक्त केल्या.

हाताला कामच नाही

पुण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला होतो. पहिल्या लॉकडाऊनमध्ये गावी आलो होतो. थोडी ढिल मिळाल्याने पुण्याला गेलो. आता पुन्हा हॉटेल बंद झाल्याने कामच नाही. पगारही बंद आहे. इतरांना जेवण वाढत होतो, आता आम्हालाच उपाशी रहावे लागत आहे.

मंगेश काळे, केज

शेतातील काम येत नाही

पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यामुळे मुंबईला नोकरीसाठी गेलो होतो. २० हजारांची नोकरीही मिळाली. पण आता कंपनीच बंद असल्याने कामावर येऊ नका म्हणून सांगितले. त्यातच शेतातील कामही येत नसल्याने अडचण आहे.

बाबासाहेब पांढरे, बीड

हे दिवस पुन्हा येऊ नयेत रे बाबा...

कोरोनाच्या पहिल्या लाॅकडाऊनमध्ये खूप त्रास झाला. नंतर काही प्रमाणात सुरळीत झाले होते. आता पुन्हा तेच दिवस आले आहेत. परंतु मागील काही महिन्यात जे अनुभवले ते दिवस पुन्हा येऊ नयेत. शहरात उपाशी राहून जगण्यापेक्षा गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जुन शिंदे, बीड

===Photopath===

120421\12_2_bed_5_12042021_14.jpeg

===Caption===

बीड बसस्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी दिसत आहे.