शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

शेतकर्‍यांसाठी शासकीय मदतच आधार; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारने प्रथम हात पुढे करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:53 IST

राज्य शासन शेतकर्‍यांच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना वार्‍यावर सोडण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहेनिकष आडसर ठरत असतील ते बदलून शेतकर्‍यांना मदत करा

अंबाजोगाई- अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी शासकीय मदतच आधार ठरेल. राज्य सरकारचा मदतीचा हात प्रथम पुढे आला पाहिजे. केंद्र सरकार तर मदत देणारच आहे. केंद्राच्या मदतीची वाट पाहत शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता तात्काळ मदत करावी. अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अंबाजोगाई तालुक्यात अपत्तीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथे मंगळवार दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ.नमिता मुंदडा, आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार, आ.रमेश कराड,आ.अभिमन्यु पवार, रमेशराव आडसकर, भिमराव धोंडे, अक्षय मुंदडा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भगवान केदार, प्रवक्ते राम कुलकर्णी, सांरंग  पुजारी, अ‍ॅड.संतोष लोमटे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित शेतकर्‍यांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, वर्षभरापासुन सातत्याने शेतकर्‍यांवर संकटाचा मारा सुरूच आहे. अतिवृष्टी, वादळी, पाऊस, गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी पिकविमा भरूनही विमा कंपन्या शेतकर्‍यांना मुर्ख बनवत आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे. मात्र राज्य शासन शेतकर्‍यांच्या बाबतीत वेळ काढूपणा करत आहे.  त्यांना वार्‍यावर सोडण्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. 

...तर नियम बदलाअतिवृष्टी व वादळी पावसाने शेतकर्‍यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात इतर पिकांसोबत ऊस मोठ्या प्रमाणात आडवा पडला आहे. या संदर्भात नुकसानीची मागणी शेतकर्‍यांनी शासनाकडे केली आहे. मात्र शासन हे नुकसान निकषात बसत नाही असे कारण पुढे करून शेतकर्‍यांना टाळत आहे. असे निकष आडसर ठरत असतील ते बदलून शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे अशी मागणीही फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडFarmerशेतकरी