शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:46 IST

यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसंभाजी पाटील निलंगेकर यांची ग्वाहीबीड जिल्ह्यात पीक पाहणी दौराअधिका-यांना सूचना; शेतक-यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.बीड जिल्ह्यातील माजलगाव व बीड तालुक्यातील वडवणी, ढोरवाडी, कान्हापूर, लक्ष्मीपूर, पोखरी, घाटसावळी, नित्रूड, पात्रूड, व धारु र या गावातील शिवारात थेट शेतीबांधावर जाऊन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन व तूर पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंग, बीड भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार सुनील पवार, चंद्रकांत फड, भूषण पाटील, धारूरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंग हजारी, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष दत्ताभाऊ घोगरे, नगरसेवक सुरेश लोकरे, तहसीलदार झांझलवार, चंद्रकांत फड, माजलगावचे शहराध्यक्ष बबन साळुंके, तालुकाध्यक्ष हणमंत कदम, कॉ. सुभाष डाके, माजी सभापती नितिन नाईकनवरे, आदीसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे निलंगेकर यांचा हा पीक पाहणी दौरा दुपारी ३ च्या दरम्यान सुरु झाला होता. मात्र शेतक-यांच्या व्यथा ऐकताना व झालेला नुकसानीची माहिती घेत असताना अंधार पडला तरीही त्यांनी शेतक-यांच्या शिवारात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.निलंगेकरांनी वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील शंकर चव्हाण, बीड तालुक्यातील पोखरी येथील सखाराम बिटे, माजलगाव तालुक्यातील नित्रुड व पाथुर्डी येथील ज्ञानेश्वर जाधव व शेख अशरफ शेख महंमद, पात्रूड येथीलच शेख चांद यांच्याशी संवाद साधला.या दौ-यादरम्यान विविध ठिकाणी शेतक-यांसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करावा या आशयाचे निवेदन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दिले.शेतकरी नाराज : धारूर तालुक्याकडे पाठ

  • धारूर तालुका हा गंभीर दुष्काळाला तोंड देत असताना दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेले भूकंप व पुनर्वसनमंत्री संभाजीराव निंलगेकर हे तालुक्यात कुठेही पाहणी न करता या भागातून गेले.
  • धारूर तालुक्यातील डोंगराळ भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी अपेक्षित असताना मंत्री आले तसेच गेले. या भागातील पाण्यासाठी होणारे हाल, पीक परिस्थिती मंत्र्यांनी पहायला हवी होती, असे शेतकरी म्हणाले.
टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाWaterपाणी