शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:46 IST

यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसंभाजी पाटील निलंगेकर यांची ग्वाहीबीड जिल्ह्यात पीक पाहणी दौराअधिका-यांना सूचना; शेतक-यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.बीड जिल्ह्यातील माजलगाव व बीड तालुक्यातील वडवणी, ढोरवाडी, कान्हापूर, लक्ष्मीपूर, पोखरी, घाटसावळी, नित्रूड, पात्रूड, व धारु र या गावातील शिवारात थेट शेतीबांधावर जाऊन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन व तूर पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंग, बीड भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार सुनील पवार, चंद्रकांत फड, भूषण पाटील, धारूरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंग हजारी, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष दत्ताभाऊ घोगरे, नगरसेवक सुरेश लोकरे, तहसीलदार झांझलवार, चंद्रकांत फड, माजलगावचे शहराध्यक्ष बबन साळुंके, तालुकाध्यक्ष हणमंत कदम, कॉ. सुभाष डाके, माजी सभापती नितिन नाईकनवरे, आदीसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे निलंगेकर यांचा हा पीक पाहणी दौरा दुपारी ३ च्या दरम्यान सुरु झाला होता. मात्र शेतक-यांच्या व्यथा ऐकताना व झालेला नुकसानीची माहिती घेत असताना अंधार पडला तरीही त्यांनी शेतक-यांच्या शिवारात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.निलंगेकरांनी वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील शंकर चव्हाण, बीड तालुक्यातील पोखरी येथील सखाराम बिटे, माजलगाव तालुक्यातील नित्रुड व पाथुर्डी येथील ज्ञानेश्वर जाधव व शेख अशरफ शेख महंमद, पात्रूड येथीलच शेख चांद यांच्याशी संवाद साधला.या दौ-यादरम्यान विविध ठिकाणी शेतक-यांसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करावा या आशयाचे निवेदन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दिले.शेतकरी नाराज : धारूर तालुक्याकडे पाठ

  • धारूर तालुका हा गंभीर दुष्काळाला तोंड देत असताना दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेले भूकंप व पुनर्वसनमंत्री संभाजीराव निंलगेकर हे तालुक्यात कुठेही पाहणी न करता या भागातून गेले.
  • धारूर तालुक्यातील डोंगराळ भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी अपेक्षित असताना मंत्री आले तसेच गेले. या भागातील पाण्यासाठी होणारे हाल, पीक परिस्थिती मंत्र्यांनी पहायला हवी होती, असे शेतकरी म्हणाले.
टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाWaterपाणी