शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:46 IST

यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसंभाजी पाटील निलंगेकर यांची ग्वाहीबीड जिल्ह्यात पीक पाहणी दौराअधिका-यांना सूचना; शेतक-यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.बीड जिल्ह्यातील माजलगाव व बीड तालुक्यातील वडवणी, ढोरवाडी, कान्हापूर, लक्ष्मीपूर, पोखरी, घाटसावळी, नित्रूड, पात्रूड, व धारु र या गावातील शिवारात थेट शेतीबांधावर जाऊन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन व तूर पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंग, बीड भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार सुनील पवार, चंद्रकांत फड, भूषण पाटील, धारूरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंग हजारी, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष दत्ताभाऊ घोगरे, नगरसेवक सुरेश लोकरे, तहसीलदार झांझलवार, चंद्रकांत फड, माजलगावचे शहराध्यक्ष बबन साळुंके, तालुकाध्यक्ष हणमंत कदम, कॉ. सुभाष डाके, माजी सभापती नितिन नाईकनवरे, आदीसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे निलंगेकर यांचा हा पीक पाहणी दौरा दुपारी ३ च्या दरम्यान सुरु झाला होता. मात्र शेतक-यांच्या व्यथा ऐकताना व झालेला नुकसानीची माहिती घेत असताना अंधार पडला तरीही त्यांनी शेतक-यांच्या शिवारात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.निलंगेकरांनी वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील शंकर चव्हाण, बीड तालुक्यातील पोखरी येथील सखाराम बिटे, माजलगाव तालुक्यातील नित्रुड व पाथुर्डी येथील ज्ञानेश्वर जाधव व शेख अशरफ शेख महंमद, पात्रूड येथीलच शेख चांद यांच्याशी संवाद साधला.या दौ-यादरम्यान विविध ठिकाणी शेतक-यांसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करावा या आशयाचे निवेदन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दिले.शेतकरी नाराज : धारूर तालुक्याकडे पाठ

  • धारूर तालुका हा गंभीर दुष्काळाला तोंड देत असताना दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेले भूकंप व पुनर्वसनमंत्री संभाजीराव निंलगेकर हे तालुक्यात कुठेही पाहणी न करता या भागातून गेले.
  • धारूर तालुक्यातील डोंगराळ भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी अपेक्षित असताना मंत्री आले तसेच गेले. या भागातील पाण्यासाठी होणारे हाल, पीक परिस्थिती मंत्र्यांनी पहायला हवी होती, असे शेतकरी म्हणाले.
टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाWaterपाणी