शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

आनंदवार्ता ! बीडमध्ये मायलेकीसह १० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 5:53 PM

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५ रुग्ण घरी परतले

- सोमनाथ खताळ

बीड : मुंबईहून आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांवर १० दिवस उपचार करण्यात आले. आता १० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहेत. यात पाटोदा तालुक्यातील मायलेकीसह केजचे, बीडचे ५ आणि इटकूर येथील एका महिलेचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १५ झाली आहे. 

बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६२ जणांची कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यात एकाचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत पाच जण कोरोनामुक्त झाले होते. सहा रुग्णांना पुण्याला पाठविले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ५० रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील पाटोदा तालुक्यातील वाहली येथील मायलेकी, बीड शहरातील पाच, इटकूर येथील महिला व केज तालुक्यातील चंदणसावरगाव व केळगाव येथील रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना शनिवारी सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ ४० रुग्ण उपचारासाठी राहणार आहेत. धारूर आणि पिंपळा येथील रुग्ण वगळता सर्व कोरोनाबाधित हे मुंबईहून आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांच्या टिमने या सर्व रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. बीड जिल्ह्यासाठी ही सुखद वार्ता आहे.

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्णगेवराई तालुक्यातील इटकूर येथील मायलेकी अशा दोघी, माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील १, कवडगाव थडी येथील २, बीड शहरातील ५, पाटोदा तालुक्यातील वाहली येथील मायलेकी अशा दोघी,  आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील १, केज तालुक्यातील केज व चंरणसावरगाव येथील दोघे,  असे १५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

पाटोद्याच्या वृद्धालाही उद्या सुटीपाटोदा शहरातील ७३ वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील १० दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांचीही प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यामुळे त्यांनाही रविवारी सुटी दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. या आजोबाची प्रकृती सुरूवातीला खुपच चिंताजनक होती. परंतु डॉक्टरांनी योग्य उपचार करून त्यांना ठणठणीत केले आहे.

गोंधळू नका, नियम वाचापूर्वी एखादी व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळली की तिच्यावर १४ दिवस उपचार केले जात होते. त्यानंतर स्वॅब घेतला जाईल. पहिला स्वॅब निगेटिव्ह आल्यावर पुन्हा २४ तासांनी दुसरा स्वॅब घेतला जायचा. हे दोन्ही निगेटिव्ह आले तरच तो कोरोनामुक्त घोषित केला जात असे. परंतू आता इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च नियमात बदल केला आहे. १० दिवस उपचार केल्यावर संबंधिताला कसलेही लक्षणे न आढळल्यास तो कोरोनामुक्त झाला असे घोषित करण्यास सांगितले. एखाद्याची प्रकृृती खुपच चिंताजनक असेल तर १४ व्या दिवशी दोन वेळा स्वॅब घेऊन ते निगेटिव्ह आले तरच तो कोरोनामुक्त झाला, असे घोषित करण्यात येणार आहे. नियमातील या बदलाची माहिती नसल्याने अनेकजण गोंधळून गेले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड