शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

आनंदवार्ता ! बीडमध्ये मायलेकीसह १० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:53 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५ रुग्ण घरी परतले

- सोमनाथ खताळ

बीड : मुंबईहून आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सर्वांवर १० दिवस उपचार करण्यात आले. आता १० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहेत. यात पाटोदा तालुक्यातील मायलेकीसह केजचे, बीडचे ५ आणि इटकूर येथील एका महिलेचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १५ झाली आहे. 

बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६२ जणांची कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यात एकाचा मृत्यू झाला होता तर आतापर्यंत पाच जण कोरोनामुक्त झाले होते. सहा रुग्णांना पुण्याला पाठविले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ५० रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील पाटोदा तालुक्यातील वाहली येथील मायलेकी, बीड शहरातील पाच, इटकूर येथील महिला व केज तालुक्यातील चंदणसावरगाव व केळगाव येथील रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना शनिवारी सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ ४० रुग्ण उपचारासाठी राहणार आहेत. धारूर आणि पिंपळा येथील रुग्ण वगळता सर्व कोरोनाबाधित हे मुंबईहून आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांच्या टिमने या सर्व रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. बीड जिल्ह्यासाठी ही सुखद वार्ता आहे.

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्णगेवराई तालुक्यातील इटकूर येथील मायलेकी अशा दोघी, माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील १, कवडगाव थडी येथील २, बीड शहरातील ५, पाटोदा तालुक्यातील वाहली येथील मायलेकी अशा दोघी,  आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील १, केज तालुक्यातील केज व चंरणसावरगाव येथील दोघे,  असे १५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

पाटोद्याच्या वृद्धालाही उद्या सुटीपाटोदा शहरातील ७३ वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील १० दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांचीही प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यामुळे त्यांनाही रविवारी सुटी दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. या आजोबाची प्रकृती सुरूवातीला खुपच चिंताजनक होती. परंतु डॉक्टरांनी योग्य उपचार करून त्यांना ठणठणीत केले आहे.

गोंधळू नका, नियम वाचापूर्वी एखादी व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळली की तिच्यावर १४ दिवस उपचार केले जात होते. त्यानंतर स्वॅब घेतला जाईल. पहिला स्वॅब निगेटिव्ह आल्यावर पुन्हा २४ तासांनी दुसरा स्वॅब घेतला जायचा. हे दोन्ही निगेटिव्ह आले तरच तो कोरोनामुक्त घोषित केला जात असे. परंतू आता इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च नियमात बदल केला आहे. १० दिवस उपचार केल्यावर संबंधिताला कसलेही लक्षणे न आढळल्यास तो कोरोनामुक्त झाला असे घोषित करण्यास सांगितले. एखाद्याची प्रकृृती खुपच चिंताजनक असेल तर १४ व्या दिवशी दोन वेळा स्वॅब घेऊन ते निगेटिव्ह आले तरच तो कोरोनामुक्त झाला, असे घोषित करण्यात येणार आहे. नियमातील या बदलाची माहिती नसल्याने अनेकजण गोंधळून गेले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड