शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

गोदावरी पात्राची चाळण; अवैध वाळू वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 00:13 IST

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वाळू पट्टयात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. ते असेपर्यंत गोदावरीचे वाळू पात्र स्थिर होते.

ठळक मुद्देरात्री वाहतूक : महसूल-पोलिसांची भूमिका बघ्याची; पर्यावरणाचे होत आहे नुकसान

गेवराई : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वाळू पट्टयात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. ते असेपर्यंत गोदावरीचे वाळू पात्र स्थिर होते. नुकतीच जिल्हाधिकारी पांडेय यांची बदली झाली. त्यानंतर वाळू माफिया सक्रिय झाले असून दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात वाळूचे टिप्पर राजरोसपणे भरुन चालत आहेत याकडे महसूल व पोलिसांचे मात्र, ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे.गेवराई तालुक्याला गेवराई नदी वरदान लाभलेली आहे. मात्र, या नदीमध्ये मोठ्याप्रमााणात उत्खनन केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यातील गुंतेगाव, राक्षसभुवन, माळसपिंपळगाव, बोरगाव, सावरगाव, खामगाव, गुळज, नागझरी, आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गंगावाडी, भोगलगाव, पांढरी, राजापूर, मनूबाई जवळा, रामपुरी, गोदी खुर्द, या ठिकाणांवरून वाळूचा सर्रास उपसा होत आहे. तसेच ही वाळू वाहतूक करण्यासाठी १० चाकी हायवा टिप्परचा वापर केला जात आहे. दिवसाढवळ््या वाळू वाहतूक सुरु आहे. तरी देखील गेवराई शहर व बायपास मार्गावरील तसेच हायवे पोलीस व महसूलचे तलाठी, मंडळअधिकारी, नायब तहसीलदार, तहसिलदार यांची भूमिका हाताची घडी-तोंडावर बोट अशा पद्धतीची आहे. त्यांचे याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर महामार्गाचे वाहतूक पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी कर्तव्यावर असताना देखील वाळूने भरलेल्या गाड्या जातात कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदी पात्रात पाणी नव्हते त्यावेळी वाळूचा बेसुमार उपसा सुरुच होता. वाळू माफियांनी १५ ते २५ फुटांपर्यंत खड्डे करुन गोदावरी पात्राची चाळणी केली होती. ही बाब जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी धडाकेबाज कार्यवाही त्यांनी केली होती. परंतु त्यांची बदली होताच पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे पुन्हा अवैध वाळू वाहतूक सुरु झाली आहे.गेवराईतील शिष्टमंडळ भेटणार आयुक्तांनागेवराई गोदा पट्ट्यातून वाळू मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. ती जिल्ह्यात थेट पुणे, मुंबईं औरंगाबाद, अहमदनगर,लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पहोचवली जाते. परंतु यामुळे गोदा पात्राची चाळण होत आहे. हे पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी गेवराई येथील एक शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेण्यार आहे. कार्यवाही न झाल्यासा आयुक्तलयासमोर आंदोलन केले जाणार आहे.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग