शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, दावणीला चारा द्या- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:45 IST

शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली. तालुक्यातील जवळबन येथील दुष्काळ निवारण व ऊस उत्पादक शेतकरी परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.परिषदेच्या अध्यक्षस्थानी बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अंकुश काळदाते हे होते. यावेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे, रसिका ढगे, पूजा मोरे, विद्यार्थी आघाडीच्या शर्मिला येवले, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.कोषाध्यक्ष धनंजय मुळे उपस्थित होते.यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी हक्काच्या मागण्यांसाठी शेतक-यांनी रस्त्यावर यावे. आपण अखेरपर्यंत साथ देऊ अशी ग्वाही दिली. प्रभू रामाचा आदर असल्याचे सांगून राम मंदिर दोन महिन्यांनी झाले तरी चालेल; मात्र सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान त्वरीत द्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शेतक-यांनी लढा उभारण्याचे आवाहन तुपकर यांनी केले. तर यावेळी पूजा मोरे यांनी कारखानदारांनी व प्रशासनाने यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कमी लेखू नये असा इशारा देत शेतक-यांनी लाचारीचं जीवन जगणे सोडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा.डॉ. पोपळे, शर्मिला येवले, रसिका धगे यांनी मनोगत व्यक्त केलेकार्यक्र माचे प्रास्ताविक कुलदीप करपे यांनी केले. या परिषदेस केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीdroughtदुष्काळ