शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, दावणीला चारा द्या- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:45 IST

शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली. तालुक्यातील जवळबन येथील दुष्काळ निवारण व ऊस उत्पादक शेतकरी परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.परिषदेच्या अध्यक्षस्थानी बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अंकुश काळदाते हे होते. यावेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे, रसिका ढगे, पूजा मोरे, विद्यार्थी आघाडीच्या शर्मिला येवले, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.कोषाध्यक्ष धनंजय मुळे उपस्थित होते.यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी हक्काच्या मागण्यांसाठी शेतक-यांनी रस्त्यावर यावे. आपण अखेरपर्यंत साथ देऊ अशी ग्वाही दिली. प्रभू रामाचा आदर असल्याचे सांगून राम मंदिर दोन महिन्यांनी झाले तरी चालेल; मात्र सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान त्वरीत द्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शेतक-यांनी लढा उभारण्याचे आवाहन तुपकर यांनी केले. तर यावेळी पूजा मोरे यांनी कारखानदारांनी व प्रशासनाने यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कमी लेखू नये असा इशारा देत शेतक-यांनी लाचारीचं जीवन जगणे सोडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा.डॉ. पोपळे, शर्मिला येवले, रसिका धगे यांनी मनोगत व्यक्त केलेकार्यक्र माचे प्रास्ताविक कुलदीप करपे यांनी केले. या परिषदेस केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीdroughtदुष्काळ