शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'१० टक्के आरक्षण द्या'; वंजारी समाजाचा वाढीव आरक्षणासाठी बीडमध्ये मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 19:26 IST

२ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी

ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकीवर समाज बहिष्कार जिल्हानिहाय मोर्चे काढण्याचा इशारा

बीड : वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते. 

राज्यात वंजारी समाजाला एनटी.डी प्रवर्गातून २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण तोकडे आहे. त्यासाठी देखील समाजाला संघर्ष करावा लागला होता. लोकसंख्येच्या प्रमाणात हे देण्यात आलेले २ टक्के आरक्षण कमी आहे. वंजारी समाजाला वाढीव आरक्षण देण्याची मागणी आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती. मंगळवारी काढण्यात आलेला मोर्चा बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्व समाजातील मुलींनी केले. शासनाने मागण्यांचा विचार करुन तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन आंदोलकांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर समाज बहिष्कार टाकेल तसेच जिल्हानिहाय मोर्चे काढण्यात येतील असा इशारा यावेळी कृती समितीने दिला.

या आहेत प्रमुख मागण्या - जातनिहाय जनगणना करण्यात यावी-  वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे- उद्योग व्यावसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे- समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृह व्हावेत-  कै. गोपीनाथराव मुंडे महामंडळ स्थापन करावे

टॅग्स :reservationआरक्षणBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडState Governmentराज्य सरकार