शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

गावंदरा हल्ला प्रकरण : मारहाणीचा बनाव करणार्‍या पोलिसांची चौकशी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:35 IST

पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

बीड : पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

१४ जानेवारी रोजी धारुर तालुक्यातील गावंदरा तांड्यावर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत आरोपी आल्याची माहिती मिळाली. धारुर ठाण्याचे उप निरीक्षक चंद्रकांत घोळवे हे तोकडा बंदोबस्त घेऊन त्याला पकडण्यासाठी रवाना झाले. विशेष म्हणजे याची माहिती वरिष्ठांना दिली नाही. तांड्यावर गेल्यानंतर आरोपीला बेड्याही ठोकल्या. परंतु तोकड्या बंदोबस्ताचा फायदा घेऊन त्या आरोपीने पलायन केले. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून या पोलिसांनी शासकीय वाहन जाळून उसाने मारहाणीचा प्रयत्न केल्याचा बनाव केला. 

यासोबतच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही ठाण्यात नोंद केला. परंतु हे सर्व प्रकरण संशयास्पद असल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोराडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. वेगवेगळे मुद्दे तपासून उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांना चौकशीचे आदेश दिले.तब्बल १५ दिवस उलटूनही नाईक यांनी चौकशी पूर्ण न केल्याने संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी लक्ष घाल्याची खात्रीलायक माहिती आहे.

पोलीस निरीक्षक गंधमही संशयाच्या भोवर्‍यातविश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण धारुर पोलिसांना चांगलेच अंगलट येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंधम हे मात्र या प्रकरणापासून दूर राहत आहेत. यापूर्वीही ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडून दिलेला अट्टल गुन्हेगार विलास बडे याने ठाण्यातून पलायन केले होते. हे प्रकरण गंधम यांच्यावरही शेकणार असल्याचे समजते. 

जबाब बाकी आहेत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे जबाब घ्यावयाचे आहेत. त्यानंतरच खरी परिस्थिती समोर येईल. दहा दिवसात चौकशी पूर्ण केली जाईल.- मंदार नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, केज

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीड