शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

परळीत मराठा आरक्षणासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:01 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी परळी तहसील कार्यालयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकला. मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठळक मुद्देगगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला

परळी : आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं...नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठा समाजाला आरक्षण नाही म्हणतो...मेगा भरती रद्द झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी परळी तहसील कार्यालयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकला. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन चालूच होते. मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परळीचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार शरद झाडके यांनी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. शहरातील शिवाजी चौकात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ठोक मोर्चासाठी मराठा समाजातील युवक जमण्यास सुरूवात झाली. दुपारी १२.३० वाजता शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व अभिवादन करून मोर्चास सुरूवात झाली.मराठाला समाजाला आरक्षण द्यावे, शेतकºयांना कर्जमाफी करावी, धान्याला हमीभाव द्यावा, शासनाची मेगा भरती रद्द करावी या मागण्यांसह एक मराठा लाख मराठा, जय भवानी-जय जिजाऊ, जय जिजाऊ-जय शिवराय अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. हा मोर्चा आझाद चौक, वैद्यनाथ महाविद्यालय रोड मार्ग परळी तहसील कार्यालयावर धडकला.

मोर्चेक-यांसमोर बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पुणे येथील आबासाहेब पाटील म्हणाले, मराठा समाज बांधवांची एकजूट हवी आहे. शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा या मागणीसाठी राज्यभर समाजबांधवांनी आतापर्यंत ५७ मोर्चे काढले. मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असा इशारा देत वज्रमूठ आवळण्याचे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयीन प्रवेश शुल्क माफीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद पाडावे, आम्हाला नाही तर कोणाला नाही असा आक्रमक पवित्रा घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी तरुणांना दिला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आता मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात पूजा करू देणार नाही असा निर्णयच मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केला आहे. पंढरपूर येथे मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आबासाहेब पाटील यांनी केले. परळीच्या माजी नगरसेविका अन्नपूर्णा जाधव यांनी शासनाला मराठा आरक्षणाचा निर्णय घेता न आल्याने बांगड्या भरण्यासाठी स्वंयसेवकाकडे बांगड्या देण्यात येत असल्याचे सांगितले.

याबरोबरच महेश डोंगरे, संजय सावंत, स्वाती नखाते, नानासाहेब जावळे, वैजनाथ सोळंके, शंकर कापसे, पुजा सोळंके, अमीत घाडगे यांनीही आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री व शासनावर कडाडून टिका केली. यावेळी मोर्चेक-यांसाठी वाहेद खान पठाण, उपगराध्यक्ष अय्युब पठाण व मित्र परिवाराने पिण्याच्या पाण्याची सोय केली. मोर्चातील घोषणांनी शहर दणाणले होते. तुळजापूरनंतर परळीत काढण्यात आलेल्या या ठोक मोर्चाचे मागील दोन आठवड्यापासून नियोजन करण्यात आले होते. शिस्तबद्धपणे निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला.

मोर्चेक-यांचे ठिय्या आंदोलनजोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा परळीतील मोर्चेकºयांनी दुपारच्या सुमारास केली आणि अद्यापही सर्वजण या मुद्यावर ठाम आहेत.उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कोणताही मोर्चेकरी आपली जागा सोडणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली होती. रात्री ९ वाजेपर्यंत पेच कायम होता.

चोख पोलीस बंदोबस्तशहरात ठिकठिकाणी पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त होता. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक २, पोलीस उपअधीक्षक ६, पोलीस निरीक्षक २०, पोलीस उपनिरीक्षक ९०, पोलीस कर्मचारी ८००, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या (२०० कर्मचारी), आरसीपी प्लाटून ३ (७५ कर्मचारी) तैनात होते.

टॅग्स :BeedबीडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMarathwadaमराठवाडा