शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

चार महिन्यानंतर खुनाचा झाला उलगडा, प्रेयसीसह सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 18:09 IST

अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा दाबून खून करण्यात येऊन घाईत अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले

बीड : अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा आवळून खून केला व नंतर प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबास घाईघाईने अंत्यसंस्कार करायला लावून पुरावा नष्ट करण्यात आला. ही घटना करेवाडी (ता. परळी) येथे घडली. घटनेनंतर चार दिवसांनी हे प्रकरण उजेडात आले. चार महिन्यांनंतर २१ डिसेंबर रोजी सिरसाळा ठाण्यात प्रेयसीसह सात जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

बाळासाहेब सुखदेव कावळे (३५, रा. करेवाडी, ता. परळी) असे मयताचे नाव आहे. अरुण सुखदेव कावळे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ बाळासाहेब हा शेती करतो तसेच किरायाने जीपही चालवतो. लग्नापूर्वीपासून त्याचे गावातील उषा खंडेराव ऊर्फ सूर्यकांत काशीद हिच्याशी प्रेमसंबंध होते. २१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री साडेनऊ वाजता बाहेरुन येतो, असे सांगून बाळासाहेब घराबाहेर पडला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान, बाळासाहेब हा प्रेयसी उषा काशीद हिच्या घरी गेला. रात्री पावणेअकरा वाजता त्याला घरात कोंडून उषा काशीद, खंडेराव ऊर्फ सूर्यकांत काशीद, ज्ञानेश्वर सदाशिव काशीद, केशव रामकिसन काशीद, सीताराम अण्णासाहेब काशीद यांनी गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यास घरामागे टाकण्यात आले. 

तो बेशुद्धावस्थेत उषा काशीदच्या घरामागे पडल्याची माहिती मिळाल्यावर भाऊ अरुण कावळे याने त्यास तातडीने कान्हापूर, सिरसाळा येथे खासगी दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगून शासकीय दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, सोबत असलेल्या राजाभाऊ बाळासाहेब कावळे व हरिभाऊ रामभाऊ कावळे यांनी तो हृदयविकाराच्या धक्क्याने गेला असावा, शवविच्छेदन करून चिरफाड कशाला करायची, असे म्हणत भावनिक केले. पहाटे तीन वाजता ते मृतदेह गावी घेऊन आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता मारेक-यांनीच अंत्यविधीची घाई करून पुरावा नष्ट केला. सर्व आरोपी फरार आहेत. घटनास्थळी उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी भेट दिली. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेवेळी गावातील एका महिलेने बाळासाहेब कावळेला उषा काशीदच्या घरात जाताना शेवटचे पाहिले होते. त्यानंतर त्याची हत्या झाली. चार दिवस ती भीतीपोटी शांत राहिली. मात्र, नंतर तिने घडला प्रकार अरुण कावळे यास सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही म्हणून अरुण कावळे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयीन आदेशावरून सात जणांवर खुनाचा गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBeedबीड