शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यानंतर खुनाचा झाला उलगडा, प्रेयसीसह सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 18:09 IST

अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा दाबून खून करण्यात येऊन घाईत अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले

बीड : अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा आवळून खून केला व नंतर प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबास घाईघाईने अंत्यसंस्कार करायला लावून पुरावा नष्ट करण्यात आला. ही घटना करेवाडी (ता. परळी) येथे घडली. घटनेनंतर चार दिवसांनी हे प्रकरण उजेडात आले. चार महिन्यांनंतर २१ डिसेंबर रोजी सिरसाळा ठाण्यात प्रेयसीसह सात जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

बाळासाहेब सुखदेव कावळे (३५, रा. करेवाडी, ता. परळी) असे मयताचे नाव आहे. अरुण सुखदेव कावळे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ बाळासाहेब हा शेती करतो तसेच किरायाने जीपही चालवतो. लग्नापूर्वीपासून त्याचे गावातील उषा खंडेराव ऊर्फ सूर्यकांत काशीद हिच्याशी प्रेमसंबंध होते. २१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री साडेनऊ वाजता बाहेरुन येतो, असे सांगून बाळासाहेब घराबाहेर पडला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान, बाळासाहेब हा प्रेयसी उषा काशीद हिच्या घरी गेला. रात्री पावणेअकरा वाजता त्याला घरात कोंडून उषा काशीद, खंडेराव ऊर्फ सूर्यकांत काशीद, ज्ञानेश्वर सदाशिव काशीद, केशव रामकिसन काशीद, सीताराम अण्णासाहेब काशीद यांनी गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यास घरामागे टाकण्यात आले. 

तो बेशुद्धावस्थेत उषा काशीदच्या घरामागे पडल्याची माहिती मिळाल्यावर भाऊ अरुण कावळे याने त्यास तातडीने कान्हापूर, सिरसाळा येथे खासगी दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगून शासकीय दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, सोबत असलेल्या राजाभाऊ बाळासाहेब कावळे व हरिभाऊ रामभाऊ कावळे यांनी तो हृदयविकाराच्या धक्क्याने गेला असावा, शवविच्छेदन करून चिरफाड कशाला करायची, असे म्हणत भावनिक केले. पहाटे तीन वाजता ते मृतदेह गावी घेऊन आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता मारेक-यांनीच अंत्यविधीची घाई करून पुरावा नष्ट केला. सर्व आरोपी फरार आहेत. घटनास्थळी उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी भेट दिली. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेवेळी गावातील एका महिलेने बाळासाहेब कावळेला उषा काशीदच्या घरात जाताना शेवटचे पाहिले होते. त्यानंतर त्याची हत्या झाली. चार दिवस ती भीतीपोटी शांत राहिली. मात्र, नंतर तिने घडला प्रकार अरुण कावळे यास सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही म्हणून अरुण कावळे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयीन आदेशावरून सात जणांवर खुनाचा गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBeedबीड